शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

उसात बहरले उन्हाळी सोयाबीनचे आंतरपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात प्रायोगिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, काही शेतकऱ्यांनी उसात आंतरपीक म्हणून हरभऱ्याची ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात प्रायोगिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, काही शेतकऱ्यांनी उसात आंतरपीक म्हणून हरभऱ्याची पेरणी केली आहे. परंतु, वांजरखेडा येथील एका शेतकऱ्याने उसाच्या नऊ फूट सरीमध्ये आंतरपीक म्हणून उन्हाळी सोयाबीन घेतले आहे. उसात सोयाबीन चांगलेच बहरले असल्याने एकरी १२ क्विं.चे उत्पादन पदरी पडेल, अशी अपेक्षा सदरील शेतकऱ्याला आहे.

तालुक्यातील वांजरखेडा येथील तालुका कृषी सल्लागार समितीचे सदस्य विठ्ठलराव पाटील यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. दोन एकरांमध्ये नऊ फूट अंतरावर उसाची लागवड केली आहे. उसाच्या दोन सरींमधील अंतर तब्बल नऊ फूट असल्याने विठ्ठलराव पाटील यांनी आंतरपीक म्हणून उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. सध्या उसातील उन्हाळी सोयाबीन चांगले बहरले असून, त्याला फुले लागत आहेत. त्यामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन पदरी पडेल, अशी अपेक्षा आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पाटील यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल, अशा पद्धतीची प्रायोगिक शेती सुरू केली आहे.

क्षेत्र कमी, उत्पादन अधिक...

शेतीमध्ये विविध प्रायोगिक पद्धतींचा वापर विठ्ठलराव पाटील हे करतात. त्यांनी नऊ फूट सरीमध्ये उन्हाळी सोयाबीनची पेरणी करून बहारदार पीक जोपासले आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची पाहणी करण्यासाठी अनेक शेतकरी पाटील यांच्या शेतीस भेट देत आहेत. उन्हाळी सोयाबीनचे एकरी १२ क्विंटलचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.