शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

साठवण तलाव ओसंडू लागले, मत्स्यबीज वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जळकोट : दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोनवळा, करंजी, हळद वाढवणा, केकत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळकोट : दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोनवळा, करंजी, हळद वाढवणा, केकत सिंदगी हे साठवण तलाव भरुन ओसंडू लागले आहेत. यामुळे त्यातील मत्स्यबीज वाहून गेल्याने मत्स्य व्यावसायिकांवर नवे संकट ओढवले आहे. त्यामुळे हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

डोंगरी तालुका असलेल्या जळकोट तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून साठवण तलाव बांधले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके बहरली होती. मध्यंतरीच्या कालावधीत २० ते २५ दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सोनवळा, करंजी, हळद वाढवणा, केकतसिंदगी, माळहिप्परगा व अन्य काही साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहेत.

या तलावांमध्ये मत्स्य व्यावसायिकांनी मत्स्यबीज सोडले होते. तलाव भरुन वाहू लागल्याने तलावात सोडलेले छोटे-छोटे मत्स्यबीज वाहून गेले आहे. त्यामुळे भविष्यात साठवण तलावात मासे राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील हळद वाढवणा, रावणकोळा, वांजरवाडा, जगळपूर, गुत्ती क्रमांक १, २, सोनवळा, करंजी, सिंदगी, माळहिप्परगा, डोंगरगाव, जंगमवाडी, शेलदरा, चेरा, धोंडेवाडी, ढोरसांगवी, जळकोट आदी गावांमध्ये मोठे तलाव आहेत. त्यांचा वापर मत्स्य व्यावसायिक करतात. मात्र, पावसामुळे मत्स्यबीज वाहून गेल्याने या व्यावसायिकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

शासनाने अनुदान द्यावे...

मत्स्यबीज वाहून गेल्याने संकट निर्माण झाले आहे. शासनाने यासाठी अनुदान द्यावे, जाळी द्यावीत. साठवण तलावाच्या परिसरात घरे बांधून द्यावीत, त्यांच्यावरील कर्ज माफ करावे, अशी मागणी जय मल्हार मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, जीवन गायकवाड, श्रीहरी पाटील दळवे, नामदेव विराळे, उस्मान शेख, नामदेव ठाकरे आदींनी केली आहे.