शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलाव ओसंडू लागले, मत्स्यबीज वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जळकोट : दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोनवळा, करंजी, हळद वाढवणा, केकत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळकोट : दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोनवळा, करंजी, हळद वाढवणा, केकत सिंदगी हे साठवण तलाव भरुन ओसंडू लागले आहेत. यामुळे त्यातील मत्स्यबीज वाहून गेल्याने मत्स्य व्यावसायिकांवर नवे संकट ओढवले आहे. त्यामुळे हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

डोंगरी तालुका असलेल्या जळकोट तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून साठवण तलाव बांधले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके बहरली होती. मध्यंतरीच्या कालावधीत २० ते २५ दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सोनवळा, करंजी, हळद वाढवणा, केकतसिंदगी, माळहिप्परगा व अन्य काही साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहेत.

या तलावांमध्ये मत्स्य व्यावसायिकांनी मत्स्यबीज सोडले होते. तलाव भरुन वाहू लागल्याने तलावात सोडलेले छोटे-छोटे मत्स्यबीज वाहून गेले आहे. त्यामुळे भविष्यात साठवण तलावात मासे राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील हळद वाढवणा, रावणकोळा, वांजरवाडा, जगळपूर, गुत्ती क्रमांक १, २, सोनवळा, करंजी, सिंदगी, माळहिप्परगा, डोंगरगाव, जंगमवाडी, शेलदरा, चेरा, धोंडेवाडी, ढोरसांगवी, जळकोट आदी गावांमध्ये मोठे तलाव आहेत. त्यांचा वापर मत्स्य व्यावसायिक करतात. मात्र, पावसामुळे मत्स्यबीज वाहून गेल्याने या व्यावसायिकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

शासनाने अनुदान द्यावे...

मत्स्यबीज वाहून गेल्याने संकट निर्माण झाले आहे. शासनाने यासाठी अनुदान द्यावे, जाळी द्यावीत. साठवण तलावाच्या परिसरात घरे बांधून द्यावीत, त्यांच्यावरील कर्ज माफ करावे, अशी मागणी जय मल्हार मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, जीवन गायकवाड, श्रीहरी पाटील दळवे, नामदेव विराळे, उस्मान शेख, नामदेव ठाकरे आदींनी केली आहे.