कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून तो रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ ते १३ मेपर्यंत लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू केले होते. दरम्यान, पवित्र रमजान महिन्यातील ईद असल्याने अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी सवलत द्यावी, अशी मागणी होत होती. त्यासाठी विविध पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी व बुधवारी या दोन दिवशी अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत सवलत दिली. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुकाने सुरू केली; मात्र ग्राहक खरेदीसाठी तुरळक दिसत होते. शहरातील पत्तेवार चौकातील भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये गर्दी दिसून आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शाहू चौक, कृष्णकांत चौक, उमा चौक, मुक्कावर चौक, चौबारा आदी भागात असणाऱ्या नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी गर्दीच नव्हती. तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन व त्यांचे सर्व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
खरेदीसाठी नागरिकांची तुरळक गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST