शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

२३ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने २३ हजार ७५५ हेक्टरवरील ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने २३ हजार ७५५ हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. दुपारच्या कडक उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात २९ हजार ७०० हेक्टर लागवडीयोग्य जमीन आहे. यंदा मृगाच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरण्यांना सुरुवात झाली होती. त्यानंतर मध्येच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पेरण्यांची गती मंदावली होती. तद्नंतर आठ दिवसांनी पुन्हा रिमझिम पाऊस झाल्याने शेतक-यांनी पेरण्या आटोपल्या. २८ हजार ५१० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या.

तालुक्यात यंदा २८ हजार ५१० हेक्टरपैकी सोयाबीनचा पेरा २३ हजार ७५५ हेक्टरवर झाला. एकंदरीत लागवड क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेण्यात आले आहे. मागील महिन्यात भिजपाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक चांगले बहरले होते. फुले लागण्यास सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत पावसाची आवश्यकता असताना १५ ते २० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे २३ हजार ७५५ हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे.

४ हजार ७५५ हेक्टरवर इतर पिके...

तालुक्यात खरिपाच्या पेरण्या २८ हजार ५१० हेक्टरवर झाल्या असून, त्यापैकी २३ हजार ७५५ हेक्टरवर सोयाबीन असून उर्वरित ४ हजार ७५५ हेक्टरवर इतर पिके घेण्यात आली आहेत. यात ज्वारी ८१, मका ५३, मूग ३२३, उडीद १५६, तूर ४ हजार १३२ हेक्टरवर आहे.

पिके दुपार धरू लागली...

सोयाबीन हे ८० ते ९० दिवसांत येणारे पीक असल्यामुळे सोयाबीनच्या पिकाला वरवर पावसाची गरज असते. परंतु, १५ ते २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. दुपारी कडक उन्हं पडत आहे. त्यामुळे सोयाबीनसह सर्व पिके दुपार धरू लागली आहेत.

दोन महिन्यांत ५० टक्के पाऊस...

तालुक्याच्या पावसाची सरासरी ७५० मिमी असली तरी तालुक्यात प्रत्येक वर्षी जवळपास १०५० मिमी पाऊस होतो. पावसाळ्यातील दोन महिने उलटले आहेत. तरीही, आतापर्यंत केवळ ५० टक्के म्हणजे ३६२ मिमी पाऊस पडला आहे.