शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

नागपंचमीला सापाला पुजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

लातूर : साप हा शब्द उच्चारताच अंगाचा थरकाप होतो. त्यामुळे साप दिसताच त्याला मारले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस सापांच्या संख्येत ...

लातूर : साप हा शब्द उच्चारताच अंगाचा थरकाप होतो. त्यामुळे साप दिसताच त्याला मारले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे महत्त्व आहे. त्यामुळे निसर्गाच्या साखळीचा समताेल राखण्यासाठी सापांना वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यात चार विषारी, दोन निमविषारी तर दहा बिनविषारी साप आढळतात. सापांबद्दल आजही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे साप दिसताच त्याला मारले जाते. मात्र, साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. शेतात पिकांचे नुकसान करणारे उंदीर हे त्याचे खाद्य आहेत. त्यामुळे अन्नसाखळीचा समतोल राखण्यास मदत होते. जिल्ह्यातील सर्पमित्रही त्यांना फोन येताच घटनास्थळी जाऊन सापांना पकडतात आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतात. त्यामुळे सापाबद्दल समाजात असणारी भीती दूर करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने सापांबद्दलची भीती दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत सर्पमित्रांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार...

विषारी साप... जिल्ह्यात नाग, मण्यार, घोणस-परड, फुरसे हे विषारी साप तर हरणटोळ, मांजऱ्या हे निमविषारी साप आढळतात. तसेच वॉल सिंधचा मण्यार, पोवळा हे विषारी जातीचे दुर्मीळ सापही आढळतात.

बिनविषारी - अजगर, पानबिवड, मांडूळ, धामण, पुकरी, डुरक्या घोणस, काळतोंड्या, कवड्या, गवत्या, तस्कर, वाळा आदी बिनविषारी साप तर दुर्मीळ दिसणारे गजरा साप, स्टाऊटचा रेती सर्प जिल्ह्यात काही ठिकाणी आढळतात. हे सर्व साप बिनविषारी आहेत.

साप हा शेतकऱ्यांचा मित्र...

सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उदरांचा नायनाट करण्यासह महत्त्वाची भूमिका साप निभावतात. वनसंपदा असलेल्या आपल्या जिल्ह्यात सर्पमित्रांकडून साप संवर्धनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. दरम्यान, निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांना न मारता निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याची गरज आहे.

सर्पमित्र काय म्हणतात...

जिल्ह्यात प्रामुख्याने चार विषारी तर दहा बिनविषारी सापांच्या प्रजाती आढळतात. साप दिसताच सर्पमित्राला संपर्क करावा. सापांना वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- भीमाशंकर गाढवे, सर्पमित्र

साप आढळला तर...

शेतात किंवा घराच्या परिसरात साप आढळल्यास तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा किंवा सापाबद्दल माहिती असल्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडून द्यावे.

ग्रामीण तसेच शहरी भागात घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. सापांबद्दल अनेक गैरसमज असल्याने त्याबाबत जनजागृतीची गरज आहे.

साप चावल्यास घरगुती उपचार न करता तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते. नागरिकांनी सापाबाबत भीती बाळगू नये.