शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नागपंचमीला सापाला पुजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

लातूर : साप हा शब्द उच्चारताच अंगाचा थरकाप होतो. त्यामुळे साप दिसताच त्याला मारले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस सापांच्या संख्येत ...

लातूर : साप हा शब्द उच्चारताच अंगाचा थरकाप होतो. त्यामुळे साप दिसताच त्याला मारले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे महत्त्व आहे. त्यामुळे निसर्गाच्या साखळीचा समताेल राखण्यासाठी सापांना वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यात चार विषारी, दोन निमविषारी तर दहा बिनविषारी साप आढळतात. सापांबद्दल आजही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे साप दिसताच त्याला मारले जाते. मात्र, साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. शेतात पिकांचे नुकसान करणारे उंदीर हे त्याचे खाद्य आहेत. त्यामुळे अन्नसाखळीचा समतोल राखण्यास मदत होते. जिल्ह्यातील सर्पमित्रही त्यांना फोन येताच घटनास्थळी जाऊन सापांना पकडतात आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतात. त्यामुळे सापाबद्दल समाजात असणारी भीती दूर करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने सापांबद्दलची भीती दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत सर्पमित्रांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार...

विषारी साप... जिल्ह्यात नाग, मण्यार, घोणस-परड, फुरसे हे विषारी साप तर हरणटोळ, मांजऱ्या हे निमविषारी साप आढळतात. तसेच वॉल सिंधचा मण्यार, पोवळा हे विषारी जातीचे दुर्मीळ सापही आढळतात.

बिनविषारी - अजगर, पानबिवड, मांडूळ, धामण, पुकरी, डुरक्या घोणस, काळतोंड्या, कवड्या, गवत्या, तस्कर, वाळा आदी बिनविषारी साप तर दुर्मीळ दिसणारे गजरा साप, स्टाऊटचा रेती सर्प जिल्ह्यात काही ठिकाणी आढळतात. हे सर्व साप बिनविषारी आहेत.

साप हा शेतकऱ्यांचा मित्र...

सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उदरांचा नायनाट करण्यासह महत्त्वाची भूमिका साप निभावतात. वनसंपदा असलेल्या आपल्या जिल्ह्यात सर्पमित्रांकडून साप संवर्धनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. दरम्यान, निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांना न मारता निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याची गरज आहे.

सर्पमित्र काय म्हणतात...

जिल्ह्यात प्रामुख्याने चार विषारी तर दहा बिनविषारी सापांच्या प्रजाती आढळतात. साप दिसताच सर्पमित्राला संपर्क करावा. सापांना वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- भीमाशंकर गाढवे, सर्पमित्र

साप आढळला तर...

शेतात किंवा घराच्या परिसरात साप आढळल्यास तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा किंवा सापाबद्दल माहिती असल्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडून द्यावे.

ग्रामीण तसेच शहरी भागात घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. सापांबद्दल अनेक गैरसमज असल्याने त्याबाबत जनजागृतीची गरज आहे.

साप चावल्यास घरगुती उपचार न करता तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते. नागरिकांनी सापाबाबत भीती बाळगू नये.