शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

लातूर : दहावीचा निकाल जाहीर झाला असून, बारावीचा निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षण मंडळाने दहावीचे ३०, अकरावीचे ३० ...

लातूर : दहावीचा निकाल जाहीर झाला असून, बारावीचा निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षण मंडळाने दहावीचे ३०, अकरावीचे ३० आणि बारावीचे ४० टक्के असे निकालाचे सूत्र जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, निकाल काय लागतो याची प्रतीक्षा लागली आहे. दहावी, अकरावी आणि बारावी असे तिन्ही मिळून सरासरी गुण बारावीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे बारावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील बारावीचे सीबीएसई विद्यार्थी - मुले - २५० मुली - २२०

जिल्ह्यातील बारावीचे स्टेट बोर्ड विद्यार्थी - मुले - १७,२०० मुली - १६,१००

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार...

दहावीत निकाल प्रथम श्रेणीत लागला होता. त्यानंतर अकरावीला नियमित कॉलेज केले. बारावीचे वर्ग कोरोनामुळे ऑनलाइन झाले. त्यात परीक्षा झालीच नाही. त्यामुळे दहावी, अकरावी, बारावीचे एकत्रित गुणाचे सूत्र निकालावर परिणाम करणारे ठरते की काय असा प्रश्न आहे. निकाल लागणार असल्याने चिंता आहे. मात्र, चांगली टक्केवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. - प्रणव बिडवे, विद्यार्थी

बारावीचा निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. परीक्षा न झाल्याने दहावी, अकरावी, बारावीचे एकत्रित मूल्यमापन केले जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे अभ्यास सुरूच असून, निकाल काय लागतो याची प्रतीक्षा लागलेली आहे. - गणेश पाटील, विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा...

बारावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने ठरवून दिलेले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के असे मिळून निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत चिंता न बाळगता पुढील अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या परीक्षांची तयारी करावी. नीट, जेईई, सीईटी याकडे लक्ष दिल्यास पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविणे सुकर होईल. - श्रीनिवास पाटील, प्राचार्य

बारावीचा निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांवर आधारित आहे. महाविद्यालयांच्या वतीनेही निकालाची कामे अंतिम टप्यात आहेत. विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी करावी. कारण नीट, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र परीक्षा होत असते. त्यामुळे बारावीच्या निकालाची चिंता करण्यापेक्षा पुढील अभ्यासक्रमासाठी गरजेच्या असलेल्या परीक्षांवर फोकस करावा. - गाेविंद शिंदे, प्राचार्य