शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

लातूर : दहावीचा निकाल जाहीर झाला असून, बारावीचा निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षण मंडळाने दहावीचे ३०, अकरावीचे ३० ...

लातूर : दहावीचा निकाल जाहीर झाला असून, बारावीचा निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षण मंडळाने दहावीचे ३०, अकरावीचे ३० आणि बारावीचे ४० टक्के असे निकालाचे सूत्र जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, निकाल काय लागतो याची प्रतीक्षा लागली आहे. दहावी, अकरावी आणि बारावी असे तिन्ही मिळून सरासरी गुण बारावीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे बारावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील बारावीचे सीबीएसई विद्यार्थी - मुले - २५० मुली - २२०

जिल्ह्यातील बारावीचे स्टेट बोर्ड विद्यार्थी - मुले - १७,२०० मुली - १६,१००

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार...

दहावीत निकाल प्रथम श्रेणीत लागला होता. त्यानंतर अकरावीला नियमित कॉलेज केले. बारावीचे वर्ग कोरोनामुळे ऑनलाइन झाले. त्यात परीक्षा झालीच नाही. त्यामुळे दहावी, अकरावी, बारावीचे एकत्रित गुणाचे सूत्र निकालावर परिणाम करणारे ठरते की काय असा प्रश्न आहे. निकाल लागणार असल्याने चिंता आहे. मात्र, चांगली टक्केवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. - प्रणव बिडवे, विद्यार्थी

बारावीचा निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. परीक्षा न झाल्याने दहावी, अकरावी, बारावीचे एकत्रित मूल्यमापन केले जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे अभ्यास सुरूच असून, निकाल काय लागतो याची प्रतीक्षा लागलेली आहे. - गणेश पाटील, विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा...

बारावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने ठरवून दिलेले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के असे मिळून निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत चिंता न बाळगता पुढील अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या परीक्षांची तयारी करावी. नीट, जेईई, सीईटी याकडे लक्ष दिल्यास पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविणे सुकर होईल. - श्रीनिवास पाटील, प्राचार्य

बारावीचा निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांवर आधारित आहे. महाविद्यालयांच्या वतीनेही निकालाची कामे अंतिम टप्यात आहेत. विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी करावी. कारण नीट, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र परीक्षा होत असते. त्यामुळे बारावीच्या निकालाची चिंता करण्यापेक्षा पुढील अभ्यासक्रमासाठी गरजेच्या असलेल्या परीक्षांवर फोकस करावा. - गाेविंद शिंदे, प्राचार्य