शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

श्रुती गोने हिचा महाविद्यालयात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:19 IST

सर्वोत्तम परिवाराकडून पूरग्रस्तांना मदत लातूर : कोकण परिसरात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सर्वोत्तम ग्रुप निलंगा यांच्या सदस्यांच्या ...

सर्वोत्तम परिवाराकडून पूरग्रस्तांना मदत

लातूर : कोकण परिसरात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सर्वोत्तम ग्रुप निलंगा यांच्या सदस्यांच्या वतीने १० हजार १५१ रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उत्तम शेळके धर्मवीर भारती, दत्तात्रय दापके यांची उपस्थिती होती. यासाठी योगेश सांडूर, उदय पाटील, तुकाराम पाटील, संतोष स्वामी, परमेश्वर शिंदे, डॉ. प्रदीप इंदलकर, डॉ. हंसराज भोसले, डॉ. प्रल्हाद साळुंके, अरुण साळुंके, केशव गंभीरे, एम.एम.जाधव, संजय कदम, गलगावे सुरेश, कालीदास बिरादार, सय्यद खय्युम, प्रशांत इंगळे, प्रदीप ढेंकरे, बबिता साळुंके, संजय आंबुलगेकर, राहुल मोरे, रविंद्र सोनटक्के, बालाजी गारमपले, दत्तात्रय दापके, जी.टी. होसूरकर, सुनील सोरडे, सोमनाथ चिंचोले आदींनी सहकार्य केले.

लातूर जिल्हा द्योग समूहाच्या वतीने लसीकरण

लातूर : जिल्हा उद्योग समूह आणि महापालिकेच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अध्यक्ष चंदुलाल बलदवा, सुनील लोहिया, जुगलकिशोर तापडिया, प्रकाश शर्मा, योगेश तोतला, मधुसूदन सोनी, कमलाकर जाधव, विलास बच्चेवार, गिरीधर तिवारी, कमलेश पाटणकर, चंदू कचोळे, अनिल कलंत्री, हेमंत नावंदर, रितेश लोया, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकरी महेशकुमार मेघमाळे, अशोक क्षीरसागर, दायमी सय्यद, मनपाचे डॉ. महेश पाटील, शारदा पौळ, रोहीणी पगडे, हेमलता देशमुख, कल्पना क्षीरसागर, शाहरुख शेख, डॉ. जयेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

दयानंद कला महाविद्यालयात लसीकरण

लातूर : दयानंद कला महाविद्यालयामध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, जयमाला गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, क्रांती माळी, ए.ए. सुरवसे, एन.आर. दहिरे, सी.एम. आदमाने, रोहिणी सांडूर, उमेश यलमटे आदींनी लसीकरण करून घेतले आहे. या उपक्रमाबद्दल संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, रमेश बियाणी, सुरेश जैन, संजय बोरा यांनी कौतुक केले आहे.

रस्त्याची दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय

लातूर : शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचत असून, वाहनांचे किरकोळ अपघात होत आहे. अंतर्गत रस्त्याची डागडुजी करण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, याकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.