शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

निराधारांची हयात प्रमाणपत्रासाठी ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST

अहमदपूर : शासनाच्या मानधनासाठी निराधारांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. तालुक्यात १० हजार निराधार असून हयात प्रमाणपत्रासाठी तालुका ...

अहमदपूर : शासनाच्या मानधनासाठी निराधारांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. तालुक्यात १० हजार निराधार असून हयात प्रमाणपत्रासाठी तालुका अथवा तलाठी सज्जावर निराधारांचे हेलपाटे सुरू आहेत. मात्र, तलाठी भेटत नसल्याने वृध्द निराधारांची ससेहोलपट होत आहे.

तालुक्यात एकूण १० हजार ३९७ निराधार आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजनेचे २ हजार ७६८, वृद्धापकाळ योजनेचे ७ हजार ६०९ लाभार्थी आहेत. या निराधारांना राज्य, केंद्र सरकारच्या वतीने मासिक ठरावीक मानधन बँक खात्यात जमा केले जाते. त्यासाठी दरवर्षी निराधारांना हयात प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय निवृत्तीवेतन मिळत नाही. दरवर्षी जुलै महिन्यात हयात प्रमाणपत्रासाठी निराधारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

सध्या या प्रमाणपत्रासाठी वृद्ध, दिव्यांग महिलांना निराधारांना तलाठी सज्जाजवळ तासन‌्तास ताटकळत बसावे लागत आहे. तसेच गर्दीही होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गर्दीमुळे नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. येथील तहसील कार्यालयात शेकडो निराधार हयात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत होते.

हयात प्रमाणपत्रासाठी वेळापत्रक...

तालुक्यात ३५ तलाठी सज्जे असून १२६ गावे आहेत. त्यातील सर्व तलाठ्यांना संबंधित गावात जाण्यासंबंधी सूचना करून त्यांचे वेळापत्रक देण्यात येणार आहे. निराधारांनी तहसील कार्यालयात अथवा तलाठी सज्जात गर्दी करू नये, असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.

निराधारांना गावातच प्रमाणपत्र...

मागील वर्षी निराधारांना थेट गावातच बँकेच्या वतीने अनुदान मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षी निराधारांनी तालुक्याच्या ठिकाणी अथवा तलाठी सज्जावर न जाता गावातच दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहावे. तिथेच त्यांना हयात प्रमाणपत्र देण्याविषयी तहसीलदारांना सूचना केली असल्याचे आ. बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.