शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST

बँकेतील ११४५ शाखातून सफाई कर्मचारी नेमलेले नाहीत तर ६४५ शाखेत शिपाई नेमलेले नाहीत. यातील ३६० शाखातून सफाई ...

बँकेतील ११४५ शाखातून सफाई कर्मचारी नेमलेले नाहीत तर ६४५ शाखेत शिपाई नेमलेले नाहीत. यातील ३६० शाखातून सफाई कर्मचारी तसेच शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत, याचा बँकेच्या ग्राहक सेवेवर विपिरित परिणाम होत असून ग्राहकांना अनावश्यक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय सरकार आता बँकातून प्रधानमंत्री जीवन विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री वय वंदन योजना, मुद्रा योजना, स्टॅन्ड अप इंडिया, मेक इन इंडिया यासारखे उपक्रम बँकेमार्फत राबवत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी फक्त एक दिवसाची देखील रजा घेता येत नाही. याबरोबरच बँकेने शाखा तसेच एटीएम वर नेमलेले सुरक्षारक्षक काढून टाकले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांत एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. व्यवस्थापन शिपाई ते क्लार्क तसेच क्लार्क ते अधिकारी पदोन्नतीत देखील चालढकल करत असल्याचा आरोप कॉ.धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे.

निदर्शने, धरणे आणि संप

२३ फेब्रुवारी रोजी सर्व शाखांसमोर निदर्शने, २६ रोजी झोनल ऑफिसेस पुढे धरणे तर सहा मार्चला महा बँकेचे मुख्य कार्यालय पुणे येथे संघटनेतर्फे महा धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे ज्यात देशभरातील पाचशेवर कर्मचारी सहभागी होतील आणि एवढे करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सन्माननीय तोडगा निघाला नाही तर महा बँकेतील एआईबीइएचे सहा हजारावर सभासद १२ मार्च रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप करतील, असे कॉ. कुलकर्णी म्हणाले.