शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! लातूरमध्ये मनपाच्या तीनशे बोअरचे पुनर्भरण; पाणीपातळीत वाढ

By हणमंत गायकवाड | Updated: December 30, 2023 17:54 IST

लातूरमध्ये १३० हातपंप नादुरुस्त, ४० विद्युत पंप कायमचे बंद

लातूर : मागील तीन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या ३०० बोअरचे पुनर्भरण करण्यात आले असून, यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवाय, पावसाळ्यापूर्वीच ८० बोअरचे पुनर्भरण करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विद्युत पंप व हातपंपाच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. १०६१ विद्युत पंप व २५४ हातपंपापैकी एकूण एक हजार शंभर बोअरद्वारे नागरिकांना पाणी मिळत आहे.

यंदाच्या पावसाळ्यामध्ये मांजरा प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नाही सद्य:स्थितीत २० टक्के जिवंत पाणीसाठा आहे या पाण्यावरच लातूर शहरासह अन्य शहराला मांजरा प्रकल्पातून पुरवठा होणार आहे. लातूर शहरासाठी दररोज ४० ते ५० एमएलडी पाणी प्रकल्पातून उचलले जाते. त्यावरचा थोडासा ताण कमी व्हावा, या हेतूने लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हातपंप व विद्युत पंपाच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन जिथे पाणी आहे, तिथे पंप सुरू केले आहेत. त्यानुसार शहरात सद्य:स्थितीत ९७६ विद्युत पंप आणि १२४ हातपंप सुरू आहेत. त्यातून नागरिकांना पाणी मिळते.

लातूर शहरातील विद्युत पंप व हातपंपाची स्थिती....लातूर शहरांमध्ये १०६१ विद्युत पंप आहेत. त्यापैकी ९७६ चालू आहेत, तर ४० विद्युत पंप कायमचे बंद असून, २५ विद्युत पंप वापरात नाहीत. शिवाय, वीस पंपामध्ये काही ना काही अडकून बंद पडले आहेत, तर २५४ हातपंपांची संख्या असून, यातील १२४ सद्य:स्थिती चालू आहेत. १३० हातपंप नादुरुस्त असून, फक्त १२४ पंपाचेच पाणी नागरिकांना घेता येत आहे.

मांजरा प्रकल्पात २० टक्के जिवंत पाणीसाठा.....लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्प महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातूनच शहराला पाणीपुरवठा आहे. मात्र यंदा पाऊस काळ चांगला झाला नाही. त्यामुळे प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ २०.२८ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजे ३५.२२८ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. जूनअखेरपर्यंत पाणी पुरवू शकते. त्यासाठीच महानगरपालिकेने थोडा आधार व्हावा म्हणून शहरातील सर्व हातपंप व विद्युत पंप सुरू केले आहेत. शिवाय, काही बोअरचे पुनर्भरण करून पाणीपातळीत वाढ करण्याचाही प्रयत्न केला आहे.

नादुरुस्त १३० हातपंपाची दुरुस्ती होणारमहापालिकेच्या अंतर्गत एकूण २५४ हातपंप आहेत. त्यापैकी १२४ हातपंप सुरू आहेत. १३० नादुरुस्त आहेत. त्यांची ही दुरुस्ती करण्यात येत आहे. तसेच वापरात नसलेल्या २५ विद्युत पंपाची दुरुस्ती होणार आहे. ज्यामुळे टंचाईत याचा फायदा होईल. त्यानुषंगाने लातूर महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी