शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आधारभूत खरेदी केंद्रावर नोंदणीच, वर्षभरात खरेदी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:13 IST

लातूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा बाजार समित्यांमध्ये शेतीमालाला अधिक भाव मिळत असल्याने हमीभाव खरेदी केंद्र यंदा ...

लातूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा बाजार समित्यांमध्ये शेतीमालाला अधिक भाव मिळत असल्याने हमीभाव खरेदी केंद्र यंदा ओस पडले आहेत. सोयाबीन आणि तूर विक्रीसाठी जवळपास २७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, प्रत्यक्षात एक रुपयाच्याही शेतमालाची शेतकऱ्यांनी सदरील केंद्रावर विक्री केली नाही. त्यामुळे वर्षभरात खरेदी शून्य आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी आधारभूत किंमत जाहीर करण्यात येते. यंदाच्या वर्षासाठी सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ८०० रुपये, तूर ६ हजार रुपये आणि हरभऱ्याचा ५ हजार १०० रुपये असा दर आहे. गत खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी राशी केल्यानंतर विक्री केली. सुरुवातीस दर कमी राहिला. मात्र, त्यानंतर उत्पादनात घट झाल्याने आणि बाजारपेठेत मागणी वाढल्याने दरात वाढ झाली. फेब्रुवारीत तर सोयाबीनला दररोज उच्चांकी भाव मिळत आहे. शनिवारी कमाल दर ४ हजार ९६४, सर्वसाधारण ४ हजार ८७० आणि किमान ४ हजार १७१ रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

तुरीची सध्या आवक घटली असून कमाल दर ७ हजार ३०, सर्वसाधारण ६ हजार ७५० आणि किमान ५ हजार ७०१ रुपये असा मिळाला आहे. तसेच हरभऱ्याची आवक वाढत असून ४ हजार ७५० रुपये असा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

तुरीसाठी २७०० जणांची नोंदणी...

नाफेडच्या आधारभूत खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी २ हजार तर तूर विक्रीसाठी २ हजार ७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, बाजारपेठेत हमीभावपेक्षा अधिक दर मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, यंदा एक रुपयाचीही खरेदी होऊ शकली नाही, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी सांगितले.

नाफेडची यंत्रणा बसूनच...

दरवर्षी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीसाठी गर्दी असते. जिल्ह्यात १६ केंद्र होते. परंतु, यंदा बाजारपेठेत अधिक दर असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनीही शेतमालाची विक्री केली नाही. त्यामुळे यंत्रणा बसून आहे.

हरभऱ्याच्या नोंदणीस सुरुवात...

१५ फेब्रुवारीपासून हरभरा विक्री नोंदणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लवकरच खरेदीस सुरुवात होणार आहे.