शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत खरेदी केंद्रावर नोंदणीच, वर्षभरात खरेदी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:13 IST

लातूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा बाजार समित्यांमध्ये शेतीमालाला अधिक भाव मिळत असल्याने हमीभाव खरेदी केंद्र यंदा ...

लातूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा बाजार समित्यांमध्ये शेतीमालाला अधिक भाव मिळत असल्याने हमीभाव खरेदी केंद्र यंदा ओस पडले आहेत. सोयाबीन आणि तूर विक्रीसाठी जवळपास २७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, प्रत्यक्षात एक रुपयाच्याही शेतमालाची शेतकऱ्यांनी सदरील केंद्रावर विक्री केली नाही. त्यामुळे वर्षभरात खरेदी शून्य आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी आधारभूत किंमत जाहीर करण्यात येते. यंदाच्या वर्षासाठी सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ८०० रुपये, तूर ६ हजार रुपये आणि हरभऱ्याचा ५ हजार १०० रुपये असा दर आहे. गत खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी राशी केल्यानंतर विक्री केली. सुरुवातीस दर कमी राहिला. मात्र, त्यानंतर उत्पादनात घट झाल्याने आणि बाजारपेठेत मागणी वाढल्याने दरात वाढ झाली. फेब्रुवारीत तर सोयाबीनला दररोज उच्चांकी भाव मिळत आहे. शनिवारी कमाल दर ४ हजार ९६४, सर्वसाधारण ४ हजार ८७० आणि किमान ४ हजार १७१ रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

तुरीची सध्या आवक घटली असून कमाल दर ७ हजार ३०, सर्वसाधारण ६ हजार ७५० आणि किमान ५ हजार ७०१ रुपये असा मिळाला आहे. तसेच हरभऱ्याची आवक वाढत असून ४ हजार ७५० रुपये असा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

तुरीसाठी २७०० जणांची नोंदणी...

नाफेडच्या आधारभूत खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी २ हजार तर तूर विक्रीसाठी २ हजार ७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, बाजारपेठेत हमीभावपेक्षा अधिक दर मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, यंदा एक रुपयाचीही खरेदी होऊ शकली नाही, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी सांगितले.

नाफेडची यंत्रणा बसूनच...

दरवर्षी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीसाठी गर्दी असते. जिल्ह्यात १६ केंद्र होते. परंतु, यंदा बाजारपेठेत अधिक दर असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनीही शेतमालाची विक्री केली नाही. त्यामुळे यंत्रणा बसून आहे.

हरभऱ्याच्या नोंदणीस सुरुवात...

१५ फेब्रुवारीपासून हरभरा विक्री नोंदणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लवकरच खरेदीस सुरुवात होणार आहे.