शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चारा-पाण्याचा प्रश्न कायम

By admin | Updated: July 31, 2014 01:24 IST

औसा : तालुक्यात यावर्षी पावसाला तब्बल महिनाभराने उशिरा सुरूवात झाली़ पेरण्या ही उशिराने झाल्या़

औसा : तालुक्यात यावर्षी पावसाला तब्बल महिनाभराने उशिरा सुरूवात झाली़ पेरण्या ही उशिराने झाल्या़ पाऊस सर्वत्र समान न झाल्यामुळे अजूनही काही भागात पेरण्या झाल्या नाहीत़ ८० ते ९० टक्के पेरण्या झाल्या़ पण अजूनही चारा आणि पाण्याचा प्रश्न मात्र गंभीरच आहे़ पेरण्यापुरता पाऊस झाला़ त्यामुळे पाणीसाठे अजूनही तळातच आहेत़ पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले पण मोठा पाऊस न झाल्यामुळे चारा उपलब्ध झाला नाही़ शेती हाच औसा तालुक्याचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतीवर उपजिवीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ जनावरे पाळूण शेती करणारे शेतकरी अधिक आहेत़ तसेच दुग्ध व्यवसायासाठी दुधाची जनावरे सांभाळणारे शेतकरीही बऱ्यापैकी आहेत़ त्यामुळे तालुक्यात दीड लाखाच्या जवळपास पशुधन आहे़ शेती करण्यासाठी दोन बैल तर दुधासाठी एखाद दुसरे जनावर सर्रास शेतकऱ्याकडे पाहायला मिळते़ पण आता पेरण्या झाल्या, पाऊस झाला़ तरीही शेतकरी जनावरांच्या चाऱ्याअभावी त्रस्त आहे़मागील वर्षी पेरण्या झाल्यानंतर पुन्हा पाऊस कमी पडल्यामुळे खरीप हंगामात चारा उपलब्ध झाला नाही़ तर रबी हंगामात पिके चांगली आल्या नंतरही गारपीट आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन तर हाती लागले नाही़ पण जनावरांचा चारा ही काळा पडला त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला़ शेतकऱ्यांनी जमा करून ठेवलेला चारा ही संपला़ त्यामुळे आता पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे़ (वार्ताहर)सांगा जनावरे जगवायची कशी़़़?महाविर माळी हे शेतकरी म्हणाले २० जनावरे आहेत जमा असलेला चारा संपला़ आता जनावरे जगवायची विकावी म्हटले तरी ग्राहक मिळत नाही़ त्यामुळे जनावरे जगवायची कसे असा प्रश्न सतावतो आहे असे सांगितले़ दशरथ मगर, प्रल्हाद सरतापे, राजाभाऊ थोरात, अनंत पाटील, रूपेश दुबे या शेतकऱ्यांनी ही आशाच प्रतिक्रिया दिल्या़