शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:54 IST

उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयेळे यांच्याशी संवाद

- संदिप शिंदे लातूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर लोकसभा मतदार संघात झालेल्या जनजागृतीमुळे मतदानाचे प्रमाण वाढले़ विशेष म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंगभेद न पाहता लोकांनी मतदान करावे, यावर मोहिमेत भर देण्यात आला़ परिणामी, लातुरात चांगले मतदान झाले, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

प्रश्न : मतदान वाढीसाठी केलेल्या जनजागृतीचा किती फायदा झाला?- लातूर लोकसभा मतदार संघात आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली़ त्यामुळे अनेक नागरिकांनी स्वंयप्रेरणेतून पुढाकार घेतला़ डोक्यावर उन्हाची तीव्रता असतानाही मतदार घराबाहेर पडले़ शिवाय, महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी सखी केंद्र, दिव्यांगाचे सक्षम केंद्र निर्माण केले़ महिला किंवा दिव्यांग सक्षमपणे निवडणूक प्रक्रियेचे काम करू शकतात, हे यातून सिद्ध झाले आहे़ 

प्रश्न : मोहिमेत कोणत्या विषयावर अधिक भर दिला?- जनजागरण मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यात आले़ ‘चुनावी पाठशाला’ उपक्रमातून शाळांमध्ये मतदान केंद्र उभारून विद्यार्थ्यांकडून निवडणूक प्रक्रिया करून घेण्यात आली़ याशिवाय, संकल्पपत्रेही पालकांना पाठविण्यात आली़ महिला, दिव्यांग, अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फतही रॅली काढून जनजागरण झाले़ आई-वडिलांना विद्यार्थ्यांना लिहिलेले संकल्पपत्र हे या मोहिमेत विशेष होते़ 

प्रश्न : निवडणूक प्रक्रियेत जनजागृतीचे नियोजन कसे होते?- निवडणूक आयोगाकडून नियोजनबद्ध कार्यक्रम देण्यात आला होता़ त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताण जाणवला नाही़ स्वीप टीम जनजागृतीसाठी स्वतंत्र होती़ शाळा, महाविद्यालयाचा सहभाग घेऊन जनजागृती झाली़ उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यावर ते प्रचाराच्या कामात लागले आणि आम्ही मतदार जनजागृतीच्या कामात लागलो़ 

प्रश्न : जनजागृतीचे नेमके धोरण काय?- निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा हाच यामागचा मुख्य उद्देश आहे़ नवमतदारांना तसेच इतर मतदारांनाही मतदानाचे महत्व लक्षात आणून देण्याचे काम या माध्यमातून करण्यात येते़ जात, धर्म, पंथ न पाहता नि:पक्ष व निर्भयपणे मतदानासाठी लोकांचा सहभाग वाढावा यासाठी मोहिम राबविण्यात आली़ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात जनजागृतीची मोहिम यशस्वी झाली़

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानlaturलातूर