शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

रेशनच्या धान्याला मिळतोय १५ रुपयांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST

लातूर जिल्ह्यात ५ लाख ९ हजार २७० रेशन कार्डधारक आहेत. त्यात ३ लाख ३० हजार केशरी, ४२ हजार अंत्योदय ...

लातूर जिल्ह्यात ५ लाख ९ हजार २७० रेशन कार्डधारक आहेत. त्यात ३ लाख ३० हजार केशरी, ४२ हजार अंत्योदय व एपीएलचे ६६ हजार ३०० लाभार्थी आहेत. यातील शेतकरी कुटुंबांना गहू २ रुपये तर तांदूळ ३ रुपये किलोप्रमाणे दिले जातात. अंत्योदय व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना धान्य मोफतच दिले जाते. कोरोना काळात अनेकांचे काम गेले, त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने गरिबांना पोटभर अन्न मिळावे या हेतूने मोफतही धान्य दिले. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे हे धान्य काळ्या बाजारात जात असल्याचे समोर आले आहे.

स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे प्रति ३ रुपये किलो गहू व २ किलो तांदूळ काही कुटुंबात अतिरिक्त ठरत आहे. काहीजण धान्याची गुणवत्ता नसल्याने तर काहीजण अधिकची साठवणूक झाल्याने विक्री करीत आहेत. बाजारात चांगले गहू ३० ते ३५ रुपये, तांदूळ किमान ३० ते ७० रुपये किलोप्रमाणे आहेत. पाव, ब्रेड, बिस्कीट, पापड्या, पशुखाद्य बनिवणाऱ्या काही कंपन्या स्वस्तात मिळणारे रेशनचे धान्य खरेदी करीत आहेत. यासाठी गल्लीबोळात धान्य जमा करून विक्री करणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

गल्लीबोळात फिरताहेत वाहने...

लातूर शहरातील अनेक भागांत धान्य खरेदी करणारे महिन्यातून एक ते दोन वेळा फिरतात. गल्लीत फिरून अनेकांना विचारणा करतात. २ ते ३ रुपये किलोप्रमाणे घेतलेले धान्य १० ते १५ रुपये किलोने विक्री होत असल्याने अनेकांना महिन्याला जवळपास १ हजार रुपयांचा नफा होत आहे. काहींच्या घरातील माणसे शिक्षण, रोजगारासाठी बाहेरगावी आहेत, अशा लाभार्थींकडे महिना दोन महिन्यांत क्विंटलभर धान्य जमते. तेवढे खाणे शक्य नसल्याने काळ्या बाजारात विक्री केले जात असल्याचे समोर आले आहे.

गहू १२, तांदूळ १५ रुपये किलो...

पापडी, पशुखाद्य, ब्रेड आदी तयार करण्यासाठी या धान्याचा वापर केला जात आहे. गावोगावी धान्य खरेदी करणारी वाहने फिरत आहेत. शहरी भागातही अनेकजण हे धान्य संकलन करतात, असे सांगण्यात आले. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.