शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश तत्काळ मागे घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST

लातूर : शासनाने वीज थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कडक धोरण अवलंबताना वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. हा आदेश ...

लातूर : शासनाने वीज थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कडक धोरण अवलंबताना वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. हा आदेश तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी शुक्रवारी वीज ग्राहक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

वीज ग्राहक संघटनेने वाढीव वीजबिल पूर्णपणे माफ करावे तसेच लाॅकडाऊन काळातील निवासी वीजबिल माफ करावे, शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल पूर्णपणे माफ करावे, आदी मागण्या केल्या आहेत. शासनाने वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा दिलेला आदेश तत्काळ मागे घ्यावा अन्यथा वीज ग्राहक व शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असेही या निवदेनात म्हटले आहे.

या निवेदनावर ॲड. उदय गवारे, विजय जाधव, शिवकुमार बनसोडे, ॲड. अजय कलशेट्टी, बसवंत भरडे, सुनील मंदाडे, धर्मराज पाटील, सतीश देशमुख, संजय मोरे, अंतेश्वर कुदरपाके, रमेश राठोड, उमेश राठोड, श्रीकांत राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित केल्यास सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शेतकरी, कष्टकरी व कामगारांवर या निर्णयामुळे संकट येणार आहे.