शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश तत्काळ मागे घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST

लातूर : शासनाने वीज थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कडक धोरण अवलंबताना वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. हा आदेश ...

लातूर : शासनाने वीज थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कडक धोरण अवलंबताना वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. हा आदेश तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी शुक्रवारी वीज ग्राहक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

वीज ग्राहक संघटनेने वाढीव वीजबिल पूर्णपणे माफ करावे तसेच लाॅकडाऊन काळातील निवासी वीजबिल माफ करावे, शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल पूर्णपणे माफ करावे, आदी मागण्या केल्या आहेत. शासनाने वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा दिलेला आदेश तत्काळ मागे घ्यावा अन्यथा वीज ग्राहक व शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असेही या निवदेनात म्हटले आहे.

या निवेदनावर ॲड. उदय गवारे, विजय जाधव, शिवकुमार बनसोडे, ॲड. अजय कलशेट्टी, बसवंत भरडे, सुनील मंदाडे, धर्मराज पाटील, सतीश देशमुख, संजय मोरे, अंतेश्वर कुदरपाके, रमेश राठोड, उमेश राठोड, श्रीकांत राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित केल्यास सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शेतकरी, कष्टकरी व कामगारांवर या निर्णयामुळे संकट येणार आहे.