शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

गव्हावर मर रोगाचा प्रार्दुभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ आणि परिसरात परतीच्या पावसामुळे विहीरी, बोअर आणि नदी - नाले तुडूंब भरल्याने पाणीपातळीत वाढ झाली ...

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ आणि परिसरात परतीच्या पावसामुळे विहीरी, बोअर आणि नदी - नाले तुडूंब भरल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. याच पाण्याच्या आधारे परिसरातील शेतकरी सिंचनद्वारे रबी पिकांसह भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. वातावरणातील बदलामुळे शेतकर्‍यांना नैसर्गिक संकटाने चांगलेच घेरले आहे. खरिप हंगामात अतीवृष्टीने उडीद, मूग व सोयाबीन पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्याला उपलब्ध पाण्यावर शेतकरी खरिप हंगामातील नुकसानीची भरपाई करण्यासाठी रबी पिकासह भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. मात्र, गत आठवड्यापासून वातावरणातील बदलामुळे दिवसा कडक उन्ह, रात्री कडक थंडी तर पहाटे धुके पडत असल्याने याचा अनिष्ट परिणाम रबी पिकावर होत आहे. सुरुवातीला हरभरा पिकावर मुरकोज रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने हरभर हातचा गेला आहे. तर आता गहू पिकावर मर रोगाचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. परिणामी, हे पिक पिवळे पडून वाळत असल्याने शेकडो हेक्टरावरील पिकाचे नुकसान होत आहे.

रबीचा हंगामही आला धाेक्यात...

सध्याच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हरभरा, गहू व ज्वारीच्या पिकावर रोगाचे आक्रमण वाढले आहे. पूर्वी येरोळ येथे कायमस्वरूपी कृषीसहाय्यक होते. मात्र, येथे सध्याला प्रभारी कृषीसहाय्यक कार्यरत आहेत. त्यांना साकोळ आणि येरोळ या दोन गावांचा पदभार देण्यात आला आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांमध्ये जनजागृती आणि कृषी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

- शिवानंद भुसारे, शेतकरी येरोळ