१३ गावांतील पहिली ते आठवीपर्यंतचा विद्यार्थीपट ७०५ आहे. शिक्षकांची संख्या ४२ आहे तर सेवकांची संख्या फक्त एकच आहे.
सद्य:स्थितीला सहा गावांत पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. मुले ८० आणि मुली ८० असे एकूण १६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
केंद्रातील १३ शाळांत एका शिक्षकाचे पद रिक्त असून, एका सेवकावर १३ शाळांचा भार असल्याचे मुख्याध्यापक रणदिवे यांनी सांगितले.
पहिली ते चौथीचे वर्ग कधी सुरू होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.