शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

आश्रमशाळांत अनिवासी वर्ग; वसतिगृह बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जिल्ह्यात ७७ निवासी आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक ३८, माध्यमिक २६ आणि उच्च माध्यमिक १३ अशा एकूण ...

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जिल्ह्यात ७७ निवासी आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक ३८, माध्यमिक २६ आणि उच्च माध्यमिक १३ अशा एकूण ७७ शाळा आहेत. व्हीजेएनटी प्रवर्गासाठी असलेल्या या शाळांमध्ये ५ टक्के एससीच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जातो. या सर्वच शाळा निवासी आहेत. पण कोविडच्या पार्श्वभूमीवर त्या बंद होत्या. शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शाळा समाजकल्याणने सुरू केल्या आहेत. २६ माध्यमिक शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र त्या ठिकाणी अद्याप निवासाची सोय नाही. मात्र ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

उच्च माध्यमिक १३ निवासी आश्रमशाळांमध्ये अकरावी व बारावीचे अनिवासी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ हजार ८० आहे. त्यापैकी १ हजार ४० नववीचे व १ हजार ४० दहावीचे आहेत. १० ते १५ टक्क्यांच्या आसपास उपस्थिती सध्या आहे. ४० विद्यार्थ्यांपैकी ५ ते ८ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. अशीच स्थिती अकरावी व बारावी वर्गाची आहे. वसतिगृह सुरू झाल्यास यामध्ये वाढ होऊ शकते, असे शिक्षकांनी सांगितले.

जिल्ह्यात ७७ निवासी आश्रमशाळा आहेत. त्यापैकी २६ माध्यमिक व १३ उच्च माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्राथमिक ३८ शाळा आहेत. या सर्व शाळा निवासी आहेत. कोविड-१९ च्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळा निवासी आहेत. परंतु, सध्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे उपस्थिती कमी आहे. ज्यांना ये-जा करणे शक्य आहे, असे विद्यार्थीच ऑफलाईन वर्गाला येत आहेत.

- एस.एन. चिकुर्ते, सहायक आयुक्त, समाजकल्याण

निवासी शाळांत अनिवासी वर्ग

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निवासी शाळांमध्ये अनिवासी वर्ग सुरू करण्यात आले असले तरी शाळांमध्ये निवास-भोजनाची सोय होणे महत्वाचे आहे. निवास-भोजनाची सोय नसणे हीच अडचण आहे. ही सोय झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढ होईल, असे अनेक पालकांसह शिक्षकांनी सांगितले.

वसतिगृह बंदच

समाजकल्याण विभागाची एकूण २५ वसतिगृह आहेत. एक हजार मुला-मुलींसह जिल्ह्यातील २४ वसतिगृहांचा त्यात समावेश आहे. समाजकल्याणच्या सर्वच आश्रमशाळा निवासी आहेत. मात्र अद्याप या शाळांमधील वसतिगृह सुरू झालेले नाहीत. वसतिगृह सुरू झाल्याशिवाय शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढू शकत नाही, हीच अडचण आहे.