शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आश्रमशाळांत अनिवासी वर्ग; वसतिगृह बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जिल्ह्यात ७७ निवासी आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक ३८, माध्यमिक २६ आणि उच्च माध्यमिक १३ अशा एकूण ...

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जिल्ह्यात ७७ निवासी आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक ३८, माध्यमिक २६ आणि उच्च माध्यमिक १३ अशा एकूण ७७ शाळा आहेत. व्हीजेएनटी प्रवर्गासाठी असलेल्या या शाळांमध्ये ५ टक्के एससीच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जातो. या सर्वच शाळा निवासी आहेत. पण कोविडच्या पार्श्वभूमीवर त्या बंद होत्या. शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शाळा समाजकल्याणने सुरू केल्या आहेत. २६ माध्यमिक शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र त्या ठिकाणी अद्याप निवासाची सोय नाही. मात्र ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

उच्च माध्यमिक १३ निवासी आश्रमशाळांमध्ये अकरावी व बारावीचे अनिवासी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ हजार ८० आहे. त्यापैकी १ हजार ४० नववीचे व १ हजार ४० दहावीचे आहेत. १० ते १५ टक्क्यांच्या आसपास उपस्थिती सध्या आहे. ४० विद्यार्थ्यांपैकी ५ ते ८ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. अशीच स्थिती अकरावी व बारावी वर्गाची आहे. वसतिगृह सुरू झाल्यास यामध्ये वाढ होऊ शकते, असे शिक्षकांनी सांगितले.

जिल्ह्यात ७७ निवासी आश्रमशाळा आहेत. त्यापैकी २६ माध्यमिक व १३ उच्च माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्राथमिक ३८ शाळा आहेत. या सर्व शाळा निवासी आहेत. कोविड-१९ च्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळा निवासी आहेत. परंतु, सध्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे उपस्थिती कमी आहे. ज्यांना ये-जा करणे शक्य आहे, असे विद्यार्थीच ऑफलाईन वर्गाला येत आहेत.

- एस.एन. चिकुर्ते, सहायक आयुक्त, समाजकल्याण

निवासी शाळांत अनिवासी वर्ग

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निवासी शाळांमध्ये अनिवासी वर्ग सुरू करण्यात आले असले तरी शाळांमध्ये निवास-भोजनाची सोय होणे महत्वाचे आहे. निवास-भोजनाची सोय नसणे हीच अडचण आहे. ही सोय झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढ होईल, असे अनेक पालकांसह शिक्षकांनी सांगितले.

वसतिगृह बंदच

समाजकल्याण विभागाची एकूण २५ वसतिगृह आहेत. एक हजार मुला-मुलींसह जिल्ह्यातील २४ वसतिगृहांचा त्यात समावेश आहे. समाजकल्याणच्या सर्वच आश्रमशाळा निवासी आहेत. मात्र अद्याप या शाळांमधील वसतिगृह सुरू झालेले नाहीत. वसतिगृह सुरू झाल्याशिवाय शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढू शकत नाही, हीच अडचण आहे.