शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

उदगीरात दिवाळीत वाढले ध्वनीप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST

उदगीर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ध्वनीची सामान्यतः पातळी ४० ते ६० डेसिबल असावी लागते. परंतु, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव ...

उदगीर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ध्वनीची सामान्यतः पातळी ४० ते ६० डेसिबल असावी लागते. परंतु, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि दुसरीकडे दिवाळीचा सण, अशा परिस्थितीत उदगीरातील ध्वनीची पातळी ही ६६ ते १२३ डेसीबलपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला. वास्तविक पाहता भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण होय. या सणाची प्रत्येकाला आतुरता असते. कारण, या सणामध्ये उत्साह, नावीन्य व आपुलकीची भावना वाढीस लागते. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. या कालावधीत मनातील अंधकार-अहंकार दिव्याच्या ज्योतीबरोबर जाळून जावा, असे अपेक्षित आहे.

आधुनिक युगामध्ये दिवाळीत परंपरेप्रमाणे वापरण्यात येणारे मातीचे दिवे सोडून मेण व विद्युत दिव्यांचा वापर वाढला. त्याबरोबर रोषणाईला महत्त्व आले. परिणामी, फटाक्यांची आतषबाजीही मोठ्या प्रमाणात वाढली. लोक आपल्या आनंदासाठी फटाक्यांचा अमर्याद वापर करु लागले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तीन दिवसांत हवा प्रदूषण व विशेषतः ध्वनीप्रदूषण वाढते. त्याचा दुष्परिणाम वर्षभर बालकांना व ज्येष्ठांना सहन करावा लागतो. दरम्यान, यंदा येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाने उदगीर शहरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवाळीत मोजली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.

दिवाळीच्या तीन दिवसांच्या काळात उदगीर शहरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उमा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोंढा मार्केट, कॅप्टन चौक, एस. टी. कॉलनी, लोणी म. औ. वि. महामंडळ या भागातील केलेल्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या दिवशी ध्वनीमर्यादा सर्वात जास्त उमा चौकात ६६ ते ११० डेसिबल तर सर्वात कमी एस. टी. कॉलनीत ६७ ते ७३ डेसिबलपर्यंत होती. दुसऱ्या दिवशी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात ८९ ते १२३ डेसिबल ध्वनीमर्यादा सर्वात जास्त होती तर सर्वात कमी लोणी म. औ. वि. महामंडळ ७६ ते ८१ डेसिबलपर्यंत होती. तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ८९ ते १२३ डेसिबल ध्वनीमर्यादा सर्वात जास्त तर सर्वात कमी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय परिसर ६६ ते ७६ डेसिबल एवढी आढळून आली आहे.

आरोग्यावर परिणाम...

दिवाळीच्या तीन दिवसांत ध्वनीची तीव्रता अतिशय जास्त होती. अशा प्रकारची ध्वनीपातळी वाढणे हे सर्वांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे डोकेदुखी, बहिरेपणा, हृदयावर ताण असा त्रास जाणवतो. गर्भातील शिशुच्या वाढीवरही परिणाम होतो, चिडचिडेपणा वाढीस लागतो व कामावरही परिणाम होतो. त्यामुळे दिवाळी साजरी करताना कमीत कमी फटाके फोडावेत. सामान्यतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ध्वनीची पातळी ही ४० ते ६० डेसिबल असावी, असे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी सांगितले.