शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

किती ही लूट, भाजी मंडईत कांदा १० रुपये, तर घराजवळ २० रुपये किलाे ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:19 IST

लातूर : प्रत्येकाच्या किचनमध्ये असलेला कांदा महात्मा फुले भाजी मंडईत ७ ते १० रुपये प्रतिकिलाे दराने मिळत आहे. मात्र, ...

लातूर : प्रत्येकाच्या किचनमध्ये असलेला कांदा महात्मा फुले भाजी मंडईत ७ ते १० रुपये प्रतिकिलाे दराने मिळत आहे. मात्र, घरासमाेर आलेल्या भाजीपाला विक्रेत्यांकडून हाच कांदा २० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे व्यापारी, विक्रेत्यांकडून ग्राहकांची जवळपास दुप्पट लूट हाेत असल्याचे समाेर आले आहे.

कांद्याचे भाव कधी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतात तर कधी आवाक्याबाहेर जातात. तीन महिन्यांपूर्वी हाच कांदा १०० रुपयांच्या घरात गेला हाेता. मात्र, कांद्याची आवक वाढली आणि पुन्हा भाव घसरले. महात्मा फुले भाजी मंडईत कांदा १० रुपये किलाे दराने मिळत आहे. मात्र, ताेच कांदा भाजीपाला विक्रेते २० ते ३० रुपये दराने विकत आहेत. आठवडा बाजारात कांद्याचे दर २० रुपयांच्या घरात आहेत. यातून व्यापाऱ्यांची नफेखाेरी वाढत असली तरी सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. यावर काेणाचे नियंत्रण आहे, असा प्रश्न त्रस्त नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

महात्मा फुले भाजी मंडईत कांदा १० तर रयतू बाजारात १५ रुपये किलाे

लातुरातील महात्मा फुले भाजी मंडई आणि इतर भागात कांद्याचे दर वेगवेगळे आहेत. रयतू बाजारात दरदिवशी खेड्या-पाड्यातून माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक हाेते. येथे हाच कांदा १५ ते २० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे. गाेलाईत हाच कांदा २० ते २५ रुपयांच्या घरात आहे.

अर्धा-पाव किलाेसाठी हाेलसेल बाजारात जाणे नाही परवडत ।

कांदा हा दरराेजच्या स्वयंपाकात वापरला जाताे. भाव कमी असो अथवा अधिक ताे खरेदी करावाच लागताे. दारासमाेर येणाऱ्या नियमित विक्रेत्यांकडून खरेदी करावा लागताे. - अनिता लातूरकर

सध्या काेराेनाचा काळ आहे. त्यामुळे दारावर आलेल्या विक्रेत्यांकडूनच भाजीपाला घेतला जात आहे. भाजी मंडईत भाव कमी असला तरी तेथे जाणे परवडत नाही. दरराेज पाव-अर्धा किलाे भाजीपाला लागताे. त्यासाठी भावाचा विचार करत नाही.

- सुनीता शिरुरकर

मेहनत शेतकऱ्यांची... तिप्पट नफा मात्र व्यापाऱ्यांची हाती...

लातूर जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची माेठी संख्या आहे. हा भाजीपाला नागपूर, हैदराबाद, पुणे, लातूरच्या मंडईत जाताे. मात्र, मंडईत हाेणाऱ्या बीटद्वारे भाव ठरवले जातात.

व्यापारी शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा खरेदी करतात आणि ताे किरकाेळ विक्रेत्यांकडे साेपवतात. या प्रक्रियेत व्यापारी दुप्पट ते तिप्पट नफा कमवतात.

शेतकऱ्यांकडून व्यापारी आणि त्यांच्याकडून किरकाेळ विक्रेते आणि ग्राहक अशी ही साखळी आहे. किरकाेळ व्यापारी दारावर भाजीपाला विक्री करतात, मात्र तीही दुप्पट भावात.

एवढा फरक कसा...

भाजीपाल्याचे दर हे हंगामानुसार ठरतात. त्याचवेळी बाजारातील टंचाई लक्षात घेत भाव वाढवले जातात. आवक वाढली की भाव घसरतात. कांद्याचेही असेच आहे. आवक घटली की मग कांदा सामान्यांना रडवताे.

- उत्तम गायकवाड

हातगाड्यांवर भाजीपाला हा दाराेदार फिरुन विकावा लागताे. त्यातच भाजी मंडईतील घाऊक भावात भाजीपाला विकता येत नाही. दारावर पाव, अर्धा आणि किलाेचा भाव ठरताे. मग या भावात फरक पडताे. घाऊकमध्ये हाच भाव निम्म्यावर येताे.

- संजय उमरगेकर