महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी आरक्षण गेले आहे. राज्य सरकारने न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली नाही, नियुक्ती केलेल्या मागासवर्गीय आयोगाला निधी देण्यात आला नाही. त्यामुळे ओबीसींच्या हक्काचे आरक्षण आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गेले आहे. सरकारने राज्यातील तमाम ओबीसी वर्गावर जाणीवपूर्वक अन्याय केला असून, जो पर्यंत ओबीसींच्या हक्काचे आरक्षण सन्मानाने परत मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते
गणेश हाके, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. विनायकराव पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा रेखाताई तरडे, जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे, तालुकाध्यक्ष प्रा. हणमंतराव देवकत्ते, गोविंद कांडनगिरे, हेमंतराव गुट्टे, बाळासाहेब होळकर, दत्तात्रय जमालपुरे, प्रताप पाटील, बालाजी गुट्टे, कुलदीप हाके, कमलाकर पाटील, माणिक नरवटे, अर्जुन गंगथडे, गोरे रघुनाथ, संतोष गोरे, प्रशांत जाभाडे, श्याम यादव, माधव मुंडे, रमेश कांबळे, राजीव खंदाडे, गयाबाई सिरसाट, ॲड. सोमनाथ फुले, ॲड. सुरनर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.