जिल्ह्यातील एकूण शाळा - ८७८
सुरू झालेल्या शाळा - १०७
सुरू न झालेल्या शाळा - ७७१
काेट....
काळजी आहेच; पण शिक्षणही महत्त्वाचे आहे...
१. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षापासून मुले घरीच असल्याने ऑनलाइन अभ्यास सुरू होता. मात्र, आता शाळा सुरू झाली असल्याने योग्य ती काळजी घेत मुलाला शाळेत पाठविले आहे. नियमित अभ्यास सुरू झाला आहे.
- सुनीता हाके
२. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहावे लागले. आता शाळा सुरू झाल्याने मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करीत मुले शाळेत उपस्थित राहत आहेत. अभ्यासाला गती मिळेल या उद्देशाने शाळेत पाठविले आहे. - मनीषा रासुरे
३. ग्रामपंचायत आणि पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. घरी राहून मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी शाळेत पाठवीत आहोत. प्रत्यक्ष वर्ग भरले असल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. योग्य ती काळजी घेत मुले शाळेत उपस्थित राहत आहेत.
- शारदा गायकवाड
चाैकट...
शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघाेळही करा...
जिल्ह्यात काेराेना विषाणूचा संसर्ग पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळेच सध्या काेराेनामुक्त गावांतील आठवीपासून पुढील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. संसर्ग ओसरला असला तरी धाेका टळलेला नाही. त्यामुळे घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी कपडे बदलावेत. तसेच अंघाेळही करावी. साेबतच सॅनिटायझर, मास्कचा नियमित वापर करावा.
अ. शाळेत गेल्यानंतर मास्क काढू नये.
ब. वारंवार हात साबणाने धुवावा अथवा सॅनिटायझर वापरावे.
क. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
ड. शाळेच्या आवारात ग्रुप करून थांबू नये.