श्री गणेशाेत्सव, ज्येष्ठागाैरी आणि नवरात्र उत्सवात माेठ्या प्रमाणावर गाेड खाद्यपदार्थ आणि मिठाईला मागणी असते. दरवर्षी मिठाईची भाववाढ १५ ते २५ टक्क्यांनी केली जाते. कच्च्या मालाचे भाव वाढल्याच्या कारणावरून ही दरवाढ करण्यात येत असल्याचे दुकानदारांकडून सांगितले जात आहे.
तेल, कच्च्या मालाचे भाव वाढले...
मिठाईसह विविध गाेड खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यातच खाद्यतेल दुपटीवर गेले आहे. दूध आणि साखर किंचित वाढली आहे. ३६ रुपये किलाे असणारी साखर आता ३८ रुपयांवर गेली आहे. उच्च प्रतीचे दूध ६० रुपये लिटरने मिळते. मिठाई महाग वाटत असली तरी ती तयार करण्यासाठीही माेठा खर्च आहे. - स्वीटमार्ट चालक
गॅस, खाद्यतेल आणि इंधन दरवाढीमुळे लागणाऱ्या कच्च्या मालात माेठी घसघशीत वाढ झाली आहे. गवर्षीच्या दरात यंदाही मिठाई विक्री करणे शक्य नाही. आम्हालाही भाववाढ करावं असे कधीच वाटत नाही. पण, नाइलाज असताे, एकंदरीत तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा मेळ घालूनच दर ठरविले जातात.
- स्वीटमार्ट चालक
दरांवर नियंत्रण काेणाचे?
स्वीटमार्ट चालक दरवाढीचे कारण सांगत असतील तरी या दरावर नियंत्रण काेणाचे? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडत आहे. दरवर्षी मिठाईसह इतर गाेड खाद्यपदार्थांचे दर वाढतात. सणासुदीच्या दिवसात मागणी वाढली की दर वाढतात, असा अनुभव ग्राहकांना आहे.
दरवाढीबाबत ग्राहकांना पडलेले प्रश्न
सध्याला मिठाईसह इतर गाेड खाद्यपदार्थांच्या भावात माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. श्री गणेशाेत्सव, ज्येष्ठागाैरी आणि नवरात्र उत्सवात मिठाईला ग्राहकांतून माेठी मागणी असते. हीच संधी शाेधून दुकानदारांकडून भाववाढ केली जात आहे. - साहेबराव किनीकर, लातूर
दूध, साखर आणि इतर खाद्यपदार्थांचे दर किंचित वाढले आहेत. अशा स्थितीत स्वीटमार्ट चालकांकडून करण्यात येणारी भाववाढ चुकीची आहे. या भाववाढीवर नेमके नियंत्रण काेणाचे आहे, हा प्रश्न ग्राहकांना कायम पडत असताे. - तानाजी लातूरकर