शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बळिराजाकडून बी-बियाणे खतांची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST

उदगीर : मागील आठवड्यापासून केंद्र सरकारने इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. उदगीरात आता पेट्रोल १०० रुपयांपेक्षा जास्त, तर ...

उदगीर : मागील आठवड्यापासून केंद्र सरकारने इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. उदगीरात आता पेट्रोल १०० रुपयांपेक्षा जास्त, तर डिझेल ९१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या दरवाढीचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी, ट्रॅक्टरने शेती मशागती कामांच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, आता खताच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता दिल्यानंतर सोमवारी बियाणे- खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर रासायनिक खतांच्या किमती वाढविल्या आहेत. १०:२६:२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली, तर डीएफएची किंमत ७१५ रुपयांनी वाढली आहे. डीएफए पूर्वी ११८५ रुपयांना मिळत होते. आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०:२६:२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ ऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहेत. पोटॅशच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.

उदगीर तालुक्यात जवळपास ६६ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. मागील वर्षी ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, १३ हजार ६०० हेक्टरवर तूर, ३ हजार हेक्टरवर संकरित ज्वारी, १ हजार ६०० हेक्टरवर उडीद, तर २ हजार हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. सोयाबीनच्या राशीवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या सोयाबीनच्या दरात वाढ झाली. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या. सध्या बाजारात सोयाबीनचा दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत गेला आहे.

मागील वर्षीचे बहुतांश शेतकऱ्यांकडे पेरणीयोग्य स्वतःचे बियाणे शिल्लक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांची खरेदी करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारपासून काही प्रमाणात सवलत दिल्याने तसेच पावसाळा जवळ आल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयासमोर रांग लावत आहेत. मे महिना संपण्यास आणखीन १५ दिवस शिल्लक असले तरी यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्ताविल्याने शेतकऱ्यांना बियाणांसाठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

बियाणांची शेतकऱ्यांकडून चौकशी...

काेरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होते. त्यामुळे व्यवहार ठप्प झाले होते. आता जिल्हा प्रशासनाने काही सवलत दिली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन बियाणांची चौकशी करीत आहेत; परंतु कंपनीकडून बियाणे येण्यास वेळ लागत आहे, असे बियाणे विक्रेते सतीश जवळगे यांनी सांगितले.