शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

बळिराजाकडून बी-बियाणे खतांची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST

उदगीर : मागील आठवड्यापासून केंद्र सरकारने इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. उदगीरात आता पेट्रोल १०० रुपयांपेक्षा जास्त, तर ...

उदगीर : मागील आठवड्यापासून केंद्र सरकारने इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. उदगीरात आता पेट्रोल १०० रुपयांपेक्षा जास्त, तर डिझेल ९१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या दरवाढीचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी, ट्रॅक्टरने शेती मशागती कामांच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, आता खताच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता दिल्यानंतर सोमवारी बियाणे- खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर रासायनिक खतांच्या किमती वाढविल्या आहेत. १०:२६:२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली, तर डीएफएची किंमत ७१५ रुपयांनी वाढली आहे. डीएफए पूर्वी ११८५ रुपयांना मिळत होते. आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०:२६:२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ ऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहेत. पोटॅशच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.

उदगीर तालुक्यात जवळपास ६६ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. मागील वर्षी ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, १३ हजार ६०० हेक्टरवर तूर, ३ हजार हेक्टरवर संकरित ज्वारी, १ हजार ६०० हेक्टरवर उडीद, तर २ हजार हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. सोयाबीनच्या राशीवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या सोयाबीनच्या दरात वाढ झाली. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या. सध्या बाजारात सोयाबीनचा दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत गेला आहे.

मागील वर्षीचे बहुतांश शेतकऱ्यांकडे पेरणीयोग्य स्वतःचे बियाणे शिल्लक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांची खरेदी करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारपासून काही प्रमाणात सवलत दिल्याने तसेच पावसाळा जवळ आल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयासमोर रांग लावत आहेत. मे महिना संपण्यास आणखीन १५ दिवस शिल्लक असले तरी यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्ताविल्याने शेतकऱ्यांना बियाणांसाठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

बियाणांची शेतकऱ्यांकडून चौकशी...

काेरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होते. त्यामुळे व्यवहार ठप्प झाले होते. आता जिल्हा प्रशासनाने काही सवलत दिली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन बियाणांची चौकशी करीत आहेत; परंतु कंपनीकडून बियाणे येण्यास वेळ लागत आहे, असे बियाणे विक्रेते सतीश जवळगे यांनी सांगितले.