शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

गावामध्ये कुपाेषण, शहरात अतिपाेषण; काेराेनाकाळात मुलांचे ‘वजन’ वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST

काेराेनाचा सर्वच समाज जीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. शाळांसह इतर शैक्षणिक संस्थांना अद्यापही टाळे आहेत.परिणामी, गत मार्च २०२० पासून ...

काेराेनाचा सर्वच समाज जीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. शाळांसह इतर शैक्षणिक संस्थांना अद्यापही टाळे आहेत.परिणामी, गत मार्च २०२० पासून मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. परिस्थिती बदलल्याने सर्वच मुले तंत्रज्ञानामध्ये अडकून पडले आहेत. परिणामी, मैदानी खेळ बंद झाले असून, मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. तासन्तास एकाच ठिकाणी, घरातच बसून राहिल्याने वजनवाढीची समस्या निर्माण झाली आहे.

पालकांच्या चेहऱ्यावर चिंता...

काेराेनाच्या काळात शाळा बंद झाल्या. ऑनलाइन शिक्षणप्रणाली सुरू झाली. यातून मुलांना एकाच ठिकाणी तासन्तास बसून रहावे लागत आहे. अद्यापही काेराेनाची भीती गेली नाही. आता तर संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत मुलांना घराबाहेर पाठवायचे कसे ही चिंता माझ्यासारख्या पालकांच्या चेहऱ्यावर आहेत. - गाेविंद भंगे, लातूर

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत शाळा कशा उघडणार, हाही प्रश्न गंभीर आहे. गत दीड वर्षापासून शाळांना टाळे आहेत. अशा स्थितीत मुले घरातच काेंडून आहेत. यातून त्यांची मानसिकता बदलली आहे. यातून आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. - प्रकाश जाधव, उदगीर

शहरात स्थूलता ही नवी

समस्या...

लातूर शहरातील मुलांमध्ये स्थूलता, लठ्ठपणा वाढवणे ही समस्या आता नव्याने समाेर आली आहे. काेराेनाच्या काळात शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणामुळे तासन्तास एकाच ठिकाणी बसून राहत आहेत. शिवाय, मैदानी खेळ बंद झाले आहेत. मुलांचे घराबाहेर फिरणे, वावरणेही बंद झाले आहे. परिणामी, मुलांच्या आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले असून, वजन वाढत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना घरातच काेंडून ठेवण्याची वेळ बहुतांश पालकांवर आली आहे. त्यातच ऑनलॉइन शिक्षणाच्या नावाखाली तासन्तास त्यांना एकाच ठिकाणी बसण्याचीही शिक्षा दिली जात आहे. याचा परिणामी त्यांच्या मानसिकतेवर हाेत आहे. मग मुलामध्ये चिडचिडपणा, ओरडणे, स्थूलपणा, वजन वाढण्याची समस्या निर्माण हाेत आहे. - डाॅ. विश्रांत भारती, लातूर

सतत १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ मुलांना घरातच काेंडून रहावे लागले आहे. ऑनलाइन शिक्षणाने तर त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल झाला आहे. भाेजन, झाेप आणि दैनंदिन वेळापत्रकात बदल झाला आहे. यातूनच मुलांच्या वजन वाढण्याच्या समस्या समाेर आल्या आहेत. पाेटाचा घेर वाढत असून, आळस वाढला आहे. - डाॅ. ओमप्रकाश कदम, उदगीर

कारणे काय...

१ काेराेना काळात शाळांना टाळे आहे. परिणामी, शाळेत हाेणाऱ्या शारीरिक हालचाली, मैदानी खेळ बंद झाले. यातून मुलांच्या आराेग्यावर परिणाम झाला आहे.

२ शहरातील मुले दिवस-दिवस घरातच बसून राहत असल्याने आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. वेळेवर जेवण आणि झाेपही मिळत नाही. तासनतास माेबाइल, टीव्हीसमाेर मुले बसून आहेत.

३ शाळा सुरू असताना हाेणारी शारीरिक हालचाल सध्याला बंद झाली आहे. दिवसदिवस बसून राहिल्याने अपचनाची समस्याही निर्माण झाली आहे.