शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

गावामध्ये कुपाेषण, शहरात अतिपाेषण; काेराेनाकाळात मुलांचे ‘वजन’ वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST

काेराेनाचा सर्वच समाज जीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. शाळांसह इतर शैक्षणिक संस्थांना अद्यापही टाळे आहेत.परिणामी, गत मार्च २०२० पासून ...

काेराेनाचा सर्वच समाज जीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. शाळांसह इतर शैक्षणिक संस्थांना अद्यापही टाळे आहेत.परिणामी, गत मार्च २०२० पासून मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. परिस्थिती बदलल्याने सर्वच मुले तंत्रज्ञानामध्ये अडकून पडले आहेत. परिणामी, मैदानी खेळ बंद झाले असून, मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. तासन्तास एकाच ठिकाणी, घरातच बसून राहिल्याने वजनवाढीची समस्या निर्माण झाली आहे.

पालकांच्या चेहऱ्यावर चिंता...

काेराेनाच्या काळात शाळा बंद झाल्या. ऑनलाइन शिक्षणप्रणाली सुरू झाली. यातून मुलांना एकाच ठिकाणी तासन्तास बसून रहावे लागत आहे. अद्यापही काेराेनाची भीती गेली नाही. आता तर संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत मुलांना घराबाहेर पाठवायचे कसे ही चिंता माझ्यासारख्या पालकांच्या चेहऱ्यावर आहेत. - गाेविंद भंगे, लातूर

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत शाळा कशा उघडणार, हाही प्रश्न गंभीर आहे. गत दीड वर्षापासून शाळांना टाळे आहेत. अशा स्थितीत मुले घरातच काेंडून आहेत. यातून त्यांची मानसिकता बदलली आहे. यातून आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. - प्रकाश जाधव, उदगीर

शहरात स्थूलता ही नवी

समस्या...

लातूर शहरातील मुलांमध्ये स्थूलता, लठ्ठपणा वाढवणे ही समस्या आता नव्याने समाेर आली आहे. काेराेनाच्या काळात शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणामुळे तासन्तास एकाच ठिकाणी बसून राहत आहेत. शिवाय, मैदानी खेळ बंद झाले आहेत. मुलांचे घराबाहेर फिरणे, वावरणेही बंद झाले आहे. परिणामी, मुलांच्या आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले असून, वजन वाढत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना घरातच काेंडून ठेवण्याची वेळ बहुतांश पालकांवर आली आहे. त्यातच ऑनलॉइन शिक्षणाच्या नावाखाली तासन्तास त्यांना एकाच ठिकाणी बसण्याचीही शिक्षा दिली जात आहे. याचा परिणामी त्यांच्या मानसिकतेवर हाेत आहे. मग मुलामध्ये चिडचिडपणा, ओरडणे, स्थूलपणा, वजन वाढण्याची समस्या निर्माण हाेत आहे. - डाॅ. विश्रांत भारती, लातूर

सतत १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ मुलांना घरातच काेंडून रहावे लागले आहे. ऑनलाइन शिक्षणाने तर त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल झाला आहे. भाेजन, झाेप आणि दैनंदिन वेळापत्रकात बदल झाला आहे. यातूनच मुलांच्या वजन वाढण्याच्या समस्या समाेर आल्या आहेत. पाेटाचा घेर वाढत असून, आळस वाढला आहे. - डाॅ. ओमप्रकाश कदम, उदगीर

कारणे काय...

१ काेराेना काळात शाळांना टाळे आहे. परिणामी, शाळेत हाेणाऱ्या शारीरिक हालचाली, मैदानी खेळ बंद झाले. यातून मुलांच्या आराेग्यावर परिणाम झाला आहे.

२ शहरातील मुले दिवस-दिवस घरातच बसून राहत असल्याने आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. वेळेवर जेवण आणि झाेपही मिळत नाही. तासनतास माेबाइल, टीव्हीसमाेर मुले बसून आहेत.

३ शाळा सुरू असताना हाेणारी शारीरिक हालचाल सध्याला बंद झाली आहे. दिवसदिवस बसून राहिल्याने अपचनाची समस्याही निर्माण झाली आहे.