शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

गावामध्ये कुपाेषण, शहरात अतिपाेषण; काेराेनाकाळात मुलांचे ‘वजन’ वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST

काेराेनाचा सर्वच समाज जीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. शाळांसह इतर शैक्षणिक संस्थांना अद्यापही टाळे आहेत.परिणामी, गत मार्च २०२० पासून ...

काेराेनाचा सर्वच समाज जीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. शाळांसह इतर शैक्षणिक संस्थांना अद्यापही टाळे आहेत.परिणामी, गत मार्च २०२० पासून मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. परिस्थिती बदलल्याने सर्वच मुले तंत्रज्ञानामध्ये अडकून पडले आहेत. परिणामी, मैदानी खेळ बंद झाले असून, मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. तासन्तास एकाच ठिकाणी, घरातच बसून राहिल्याने वजनवाढीची समस्या निर्माण झाली आहे.

पालकांच्या चेहऱ्यावर चिंता...

काेराेनाच्या काळात शाळा बंद झाल्या. ऑनलाइन शिक्षणप्रणाली सुरू झाली. यातून मुलांना एकाच ठिकाणी तासन्तास बसून रहावे लागत आहे. अद्यापही काेराेनाची भीती गेली नाही. आता तर संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत मुलांना घराबाहेर पाठवायचे कसे ही चिंता माझ्यासारख्या पालकांच्या चेहऱ्यावर आहेत. - गाेविंद भंगे, लातूर

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत शाळा कशा उघडणार, हाही प्रश्न गंभीर आहे. गत दीड वर्षापासून शाळांना टाळे आहेत. अशा स्थितीत मुले घरातच काेंडून आहेत. यातून त्यांची मानसिकता बदलली आहे. यातून आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. - प्रकाश जाधव, उदगीर

शहरात स्थूलता ही नवी

समस्या...

लातूर शहरातील मुलांमध्ये स्थूलता, लठ्ठपणा वाढवणे ही समस्या आता नव्याने समाेर आली आहे. काेराेनाच्या काळात शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणामुळे तासन्तास एकाच ठिकाणी बसून राहत आहेत. शिवाय, मैदानी खेळ बंद झाले आहेत. मुलांचे घराबाहेर फिरणे, वावरणेही बंद झाले आहे. परिणामी, मुलांच्या आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले असून, वजन वाढत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना घरातच काेंडून ठेवण्याची वेळ बहुतांश पालकांवर आली आहे. त्यातच ऑनलॉइन शिक्षणाच्या नावाखाली तासन्तास त्यांना एकाच ठिकाणी बसण्याचीही शिक्षा दिली जात आहे. याचा परिणामी त्यांच्या मानसिकतेवर हाेत आहे. मग मुलामध्ये चिडचिडपणा, ओरडणे, स्थूलपणा, वजन वाढण्याची समस्या निर्माण हाेत आहे. - डाॅ. विश्रांत भारती, लातूर

सतत १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ मुलांना घरातच काेंडून रहावे लागले आहे. ऑनलाइन शिक्षणाने तर त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल झाला आहे. भाेजन, झाेप आणि दैनंदिन वेळापत्रकात बदल झाला आहे. यातूनच मुलांच्या वजन वाढण्याच्या समस्या समाेर आल्या आहेत. पाेटाचा घेर वाढत असून, आळस वाढला आहे. - डाॅ. ओमप्रकाश कदम, उदगीर

कारणे काय...

१ काेराेना काळात शाळांना टाळे आहे. परिणामी, शाळेत हाेणाऱ्या शारीरिक हालचाली, मैदानी खेळ बंद झाले. यातून मुलांच्या आराेग्यावर परिणाम झाला आहे.

२ शहरातील मुले दिवस-दिवस घरातच बसून राहत असल्याने आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. वेळेवर जेवण आणि झाेपही मिळत नाही. तासनतास माेबाइल, टीव्हीसमाेर मुले बसून आहेत.

३ शाळा सुरू असताना हाेणारी शारीरिक हालचाल सध्याला बंद झाली आहे. दिवसदिवस बसून राहिल्याने अपचनाची समस्याही निर्माण झाली आहे.