शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

१५ दिवस शिल्लक राहिले असतानाही लॉटरी निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांचे जीवनमान उंचावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब ...

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांचे जीवनमान उंचावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. त्यासाठी दोन वर्षांपासून ऑनलाइन प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. तसेच आदिवासी समाजातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी योजना राबविण्यात येते. या दोन्ही योजनेंतर्गत नवीन सिंचन विहीर खोदकामासाठी अडीच लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार, इनरवेल बोअरिंगसाठी २० हजार, पंप संचासाठी २० हजार, वीजजोडणीसाठी १० हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख, ठिबक सिंचनासाठी ५० हजार, तुषार संचासाठी २५ हजार, असे अनुदान देण्यात येते.

दरम्यान, शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींमुळे सदरील वर्षात या योजनांना तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, त्यापूर्वी महाडीबीटीवर प्रस्ताव मागविले होेते. दरम्यान, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही स्थगिती उठविल्याने शेतकऱ्यांचे लॉटरीकडे लक्ष लागून आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ १५ दिवस शिल्लक असताना अद्यापही लॉटरी प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.

इतर घटकांसाठी एक वर्षाचा कालावधी...

सिंचन विहीर खोदकामासाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे वर्षअखेरीसही लॉटरी निघाली तर केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहणार आहे. मात्र, जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीजजोडणी अशा इतर घटकांसाठी केवळ एक वर्षाचा कालावधी आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ १५ दिवस शिल्लक असतानाही लॉटरी निघाली नाही. त्यामुळे प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

एकूण १० कोटी २९ लाखांचा निधी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी ९ कोटी, तर बिरसा मुंडा कृषी योजनेसाठी १ कोटी २९ लाखांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. कृषी स्वावलंबनअंतर्गत विहिरीसाठी ४६५, तर इतर घटकासाठी ६०७ असे एकूण १ हजार ७१, तर कृषी योजनेंतर्गतच्या सिंचन विहिरीसाठी ६६ आणि इतर घटकासाठी १२३ असे एकूण १८९ प्रस्ताव आहेत. लॉटरी प्रक्रिया न झाल्याने लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया झाली नाही.

लवकरच लॉटरी प्रक्रिया होईल...

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सिंचन विहिरीसाठी १५ लाभार्थ्यांची निवड झाली आहे. कागदपत्रांची छाननी तसेच कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी स्वावलंबन योजनेची लॉटरी प्रक्रिया झाली नाही. ती लवकरच होईल.

- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी, जि.प.