शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

आता हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST

शुभमुहूर्त... लातूर जिल्ह्यात डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर जूनच्या शेवटच्या आठवड्यात निर्बंध जारी करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. ...

शुभमुहूर्त...

लातूर जिल्ह्यात डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर जूनच्या शेवटच्या आठवड्यात निर्बंध जारी करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. परिणामी, विवाह सोहळ्यावरही निर्बंध आले आहेत. जुलै महिन्यात ५ विवाहाचे मुहूर्त आहेत. अनेकांनी या तारखा बुक केल्या आहेत. यामध्ये २२, २५, २६, २८, २९ जुलै या तारखेला लग्न सोहळ्यांचा बार उडणार आहे.

असे आहेत नियम...

कोरोनामुळे विवाह सोहळ्यांना नव्याने नियम आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते. मात्र पुन्हा डेल्टा प्लसच्या भीतीने रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी आदेश जारी केले. आठवड्यातील दोन दिवस शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन आहे.

परवानगीसाठी अग्निदिव्य...

मार्च २०२० पासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी, विवाह सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. आता केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न उरकावे लागणार आहे.

यासाठी वरपिता आणि वधुपिता यांन परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागणार आहे. परवानगीनंतरच विवाह सोहळा उरकता येईल. या सोहळ्यासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. सोहळ्यादरम्यान कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. शिवाय, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे.

वधू-वरपित्याची कसरत...

गतवर्षीपासून कोरोनामुळे विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. आता नियम शिथिल झाल्याने पुन्हा विवाह सोहळे होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील तारखा रद्द कराव्या लागल्या. कोरोनाची रुग्णसंख्या ओसरल्याने जुलै महिन्यातील तारीख अनेकांनी काढली आहे. आता मात्र केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आल्याने अडचणीत भर पडली आहे. कुटुंबातील आणि आप्तस्वकीय ५० पेक्षा अधिक असतात. निमंत्रण पत्रिका देण्याची मोठी कसरत आहे.

विवाह सोहळ्यासाठी जुलै महिन्यात पाच मुहूर्त आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने जुलै महिन्यात विवाह सोहळे उरकता येतील, असा बेत आहे. अनेकदा लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे तारखा पुढे ढकलण्याची वेळ कुटुंब प्रमुखावर आली. आता पन्नास व्यक्तींचीच मर्यादा ठेवण्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, वधू आणि वरपित्याची चिंता वाढली आहे. कोणाला निमंत्रण द्यायचे आणि कोणाला नाही, हा प्रश्न अनेक कुटुंबप्रमुखांना पडला आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.