शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

काेराेनाने लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये झाला बदल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्याच्या गर्दीवर आता मर्यादा आली आहे. त्यामुळे लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. विवाह ...

लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्याच्या गर्दीवर आता मर्यादा आली आहे. त्यामुळे लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. विवाह साेहळ्यांचा धामधूमपणा, हाेणारा भरमसाठ खर्च, बडेजाव, ट्रेड आता बदलला आहे. सध्या काेराेनाच्या नियमांना प्राधान्य देत अनावश्यक खर्चाला फाटा दिला जात आहे. एकमेकांकडील माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसाेहळा उरकण्यावर भर दिला जात आहे. यातून वधू आणि वराकडील कुटुंबीयांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. एकमेकांच्या अडचणी समजून घेत, त्यातून मार्ग काढत लग्न साेहळ्याला अनेकांनी प्राधान्य दिले आहे. अतिशय साध्या पद्धतीने हाेणाऱ्या लग्न साेहळ्यांमुळे अनेक कुटुंबांवर पडणारा खर्चाचा बाेजा यातून दूर हाेत आहे. मुला-मुलींचे वाढते वय, करियरची चिंता यामुळे अनेकांनी अनुरुप जाेडीदार पाहण्यावर भर दिला आहे.

या अपेक्षांची पडली भर...

काेराेना काळात करियरला महत्त्व आणि ते घडविण्यासाठी हाेणारी मदत याला प्राधान्य दिले जात आहे.

मार्च २०२०पासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत. शिवाय नाेकरी, राेजगारावरही संकट काेसळले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वधूकडील मंडळींनी मदत करावी, अशी अपेक्षा वाढली आहे.

तर वधू-वराच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. शिवाय करियरसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा वाढली आहे.

या अपेक्षा झाल्या कमी...

काेराेना काळात मानपान, बडेजावपणाची अपेक्षा कमी झाली आहे. माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकण्यावर भर आहे.

मंगल कार्यालयाला दूर सारत घराच्या अंगणातच लग्न करुन द्या, अशी अपेक्षा वराकडील मंडळींची वाढली आहे. यातून लग्न उरकणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.

हुंडा आणि साेन्याच्या दागिन्यांची मागणीही कमी झाली आहे. एकमेकांची गरज ओळखून लग्नाला प्राधान्य दिले जात आहे.

वधू-वर सूचक मंडळ चालक म्हणतात...

काेराेनाने लग्नाच्या पद्धती, गरजा आणि ट्रेड बदलला आहे. पूर्वी मंगल कार्यालयातच लग्न करण्यावर वराकडील मंडळींचा भर असायचा. आता छाेट्याशा हाॅलमध्ये, घरासमाेरील अंगणातही लग्न हाेत आहेत. आता पाहुण्यांच्या गर्दीवर माेठ्या प्रमाणावर नियंत्रण आले आहे. यातून वधू आणि वराकडील मंडळींच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. - बालाजी साेनकांबळे, लातूर

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासनाकडून काही निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. लग्न साेहळ्यात हाेणाऱ्या गर्दीवर मर्यादा आली आहे. अशास्थितीत काही माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसाेहळा उरकण्यावर भर आहे. यावेळी भरमसाठ अपेक्षा ठेवल्या जात नाहीत. आहे त्या परिस्थितीत लग्न करण्याला प्राधान्य दिले जात आहे. - मनाेहरराव डाकरे, निलंगा