शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

काेराेनाने लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये झाला बदल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्याच्या गर्दीवर आता मर्यादा आली आहे. त्यामुळे लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. विवाह ...

लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्याच्या गर्दीवर आता मर्यादा आली आहे. त्यामुळे लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. विवाह साेहळ्यांचा धामधूमपणा, हाेणारा भरमसाठ खर्च, बडेजाव, ट्रेड आता बदलला आहे. सध्या काेराेनाच्या नियमांना प्राधान्य देत अनावश्यक खर्चाला फाटा दिला जात आहे. एकमेकांकडील माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसाेहळा उरकण्यावर भर दिला जात आहे. यातून वधू आणि वराकडील कुटुंबीयांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. एकमेकांच्या अडचणी समजून घेत, त्यातून मार्ग काढत लग्न साेहळ्याला अनेकांनी प्राधान्य दिले आहे. अतिशय साध्या पद्धतीने हाेणाऱ्या लग्न साेहळ्यांमुळे अनेक कुटुंबांवर पडणारा खर्चाचा बाेजा यातून दूर हाेत आहे. मुला-मुलींचे वाढते वय, करियरची चिंता यामुळे अनेकांनी अनुरुप जाेडीदार पाहण्यावर भर दिला आहे.

या अपेक्षांची पडली भर...

काेराेना काळात करियरला महत्त्व आणि ते घडविण्यासाठी हाेणारी मदत याला प्राधान्य दिले जात आहे.

मार्च २०२०पासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत. शिवाय नाेकरी, राेजगारावरही संकट काेसळले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वधूकडील मंडळींनी मदत करावी, अशी अपेक्षा वाढली आहे.

तर वधू-वराच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. शिवाय करियरसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा वाढली आहे.

या अपेक्षा झाल्या कमी...

काेराेना काळात मानपान, बडेजावपणाची अपेक्षा कमी झाली आहे. माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकण्यावर भर आहे.

मंगल कार्यालयाला दूर सारत घराच्या अंगणातच लग्न करुन द्या, अशी अपेक्षा वराकडील मंडळींची वाढली आहे. यातून लग्न उरकणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.

हुंडा आणि साेन्याच्या दागिन्यांची मागणीही कमी झाली आहे. एकमेकांची गरज ओळखून लग्नाला प्राधान्य दिले जात आहे.

वधू-वर सूचक मंडळ चालक म्हणतात...

काेराेनाने लग्नाच्या पद्धती, गरजा आणि ट्रेड बदलला आहे. पूर्वी मंगल कार्यालयातच लग्न करण्यावर वराकडील मंडळींचा भर असायचा. आता छाेट्याशा हाॅलमध्ये, घरासमाेरील अंगणातही लग्न हाेत आहेत. आता पाहुण्यांच्या गर्दीवर माेठ्या प्रमाणावर नियंत्रण आले आहे. यातून वधू आणि वराकडील मंडळींच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. - बालाजी साेनकांबळे, लातूर

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासनाकडून काही निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. लग्न साेहळ्यात हाेणाऱ्या गर्दीवर मर्यादा आली आहे. अशास्थितीत काही माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसाेहळा उरकण्यावर भर आहे. यावेळी भरमसाठ अपेक्षा ठेवल्या जात नाहीत. आहे त्या परिस्थितीत लग्न करण्याला प्राधान्य दिले जात आहे. - मनाेहरराव डाकरे, निलंगा