शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

झटपट साेयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

सन २०१७च्या हंगामामध्ये ३ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी साेयाबीनचा पेरा घेतला हाेता. या पेऱ्यामध्ये दरवर्षी वाढ झाली असून, ...

सन २०१७च्या हंगामामध्ये ३ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी साेयाबीनचा पेरा घेतला हाेता. या पेऱ्यामध्ये दरवर्षी वाढ झाली असून, २०१८मध्ये ३ लाख ५० हजार हेक्टर, २०१९मध्ये ३ लाख ९० हजार हेक्टर, २०२०मध्ये ४ लाख १० हजार हेक्टर आणि २०२१मधील हंगामात ४ लाख २७ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी साेयाबीनला प्राधान्य देत आहेत. लातूर जिल्ह्यात साेयाबीनपाठाेपाठ उसाला प्राधान्य दिले जाते. जिल्ह्यातील जवळपास ६ लाख ३० हजार हेक्टरपैकी ४ लाख २७ हजार हेक्टरवर यंदा साेयाबीनचा पेरा झाला आहे.

झटपट येणारे साेयाबीन...

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्या - दुसऱ्या पावसानंतर साेयाबीनचा पेरा केला जाताे. झटपट येणाऱ्या साेयाबीनच्या बियाण्याची लागवड केल्यानंतर जवळपास तीन महिन्यात हे पीक काढणीच्या स्थितीत येते. त्यामुळे प्रारंभीला आणि मध्ये कधीही पावसाने हजेरी लावली तरी या पिकाला त्याचा फायदाच हाेताे.

मध्यम कालावधीत येणारे साेयाबीन...

मध्यम कालावधीत येणाऱ्या साेयाबीनचा पेरा हादेखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात हाेतो. लागवड झाल्यानंतर ऑक्टाेबर महिन्यात पीक काढणीला येते. सध्याला या पिकाची स्थिती चांगली असून, यंदा हंगाम चांगला राहण्याची शक्यता आहे.

जास्त कालावधीत येणारे साेयाबीन...

या साेयाबीनचा कालावधी हा पूर्ण चार महिन्यांचा असताे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेल्या साेयाबीनची काढणी ऑक्टाेबरमध्ये हाेते. जास्त कालावधीसाठी लागवड झालेल्या साेयाबीनच्या पिकाला परतीच्या पावसाचा फटका बसला.

चांगल्याचा पावसाचा फायदा...

यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झाला आहे. परिणामी, साेयाबीनला फायदा झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबल्याने पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे साेयाबीन पाण्यात हाेते. - दत्तात्रय गावसाने, कृषी अधीक्षक, लातूर

मध्यम कालावधीत येणाऱ्या साेयाबीनपासून शेतकऱ्यांच्या पदरी चांगले उत्पादन मिळेल. सायाेबीन काढणीनंतर लागलीच विक्री करावे, असे नाही. ते घरात ठेवून याेग्य भाव आल्यानंतरही विकता येते. बाजारातील आवक आणि भाव पाहून विक्रीचा निर्णय घेता येताे. शिवाय, रान लवकरच रिकामे हाेते. - हणमंतराव मुळे, किनी

साेयाबीनला यंदाच्या हंगामात प्रतिक्विंटल दहा हजारांवर भाव मिळाला. मात्र, या काळात बाजारातील आवक अल्प हाेती. आवक वाढली की, भाव काेसळतात. हे पीक आर्थिक उत्पन्न देणारे आहे. शिवाय, जमिनीचा पाेतही सुधारण्यासाठी फायदा हाेताे. त्याचबराेबर पशुधनासाठी भुसाही चारा म्हणून मिळताे. साेयाबीनची लागवड शेतकऱ्यांना परवडणारी आहे. - अंबादास चिखले, वाढवणा