शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

चौकशी समितीचा अहवाल गुलदस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

चाकूर : तालुक्यातील बनसावरगाव येथील स्मशानभूमीचे शेड, भाटसांगवीतील अंगणवाडीचे छत कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या, तसेच जानवळ येथे सहा वर्षांपूर्वी ...

चाकूर : तालुक्यातील बनसावरगाव येथील स्मशानभूमीचे शेड, भाटसांगवीतील अंगणवाडीचे छत कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या, तसेच जानवळ येथे सहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या छताला लोखंडी पाइपचा टेकू देण्यात आला. या घटना जवळपास तीन वर्षांपूर्वी घडल्या. त्याच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेने त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती; मात्र या समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे, चौकशी समितीतील एक सदस्य सेवानिवृत्त झाले आहेत.

बनसावरगाव येथे जनसुविधा योजनेंतर्गत सार्वजनिक स्मशानभूमीचे बांधकाम सहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. शेड उभारणीवर ४ लाख खर्च झाला होता. २०१३ मध्ये हे काम पूर्ण झाले; परंतु सहा वर्षांत हे शेड कोसळले. गावात अंत्यविधीसाठी दुसरी जागा नव्हती. त्यामुळे विद्यमान सरपंच नीलेश भंडे यांनी नव्याने शेड उभारणीची मागणी केली. चार महिन्यांपूर्वी ६ लाख २५ हजार खर्चून बांधकाम पूर्ण केले; परंतु पूर्वीच्या पडलेल्या शेडचा चौकशी अहवाल अद्याप समोर आला नाही.

भाटसांगवी येथील अंगणवाडीच्या छताचा गिलावा कोसळून चार विद्यार्थी जखमी झाले. त्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जानवळ येथे दोन स्मशानभूमी आहेत. त्यापैकी सार्वजनिक स्मशानभूमीत सन २०१२-१३ मध्ये साडेचार लाख खर्चून सिमेंट शेड बांधण्यात आले. एक- दोन वर्षांपूर्वी या शेडची परिस्थिती पाहता शेड केव्हाही कोसळू शकतो, असे दिसू लागल्याने सदरील शेडला लोखंडी पाइपचा टेकू देण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्यांना जीव मुठीत धरुन थांबावे लागत आहे.

जानवळ येथील माळी गल्लीतील अंगणवाडी क्र. ७ ची इमारत धोकादायक होती. २०११- १२ मध्ये या अंगणवाडीच्या बांधकामावर ४ लाख ५० हजार खर्च झाले होते. पाया मजबूत नसल्याने इमारत केव्हाही ढासळू शकते. अशा धोकादायक इमारतीत अंगणवाडी भरली जात होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये या धोकादायक इमारतीसंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रसिद्ध होताच पंचायत समितीचे उपगटविकास अधिकारी आकाश गोकनवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि पर्यायी जागेत अंगणवाडी भरविण्याचे आदेश दिले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपअभियंता एस.टी. निकम यांनी अंगणवाडीची प्रत्यक्ष पाहणी करून सदरील इमारतीत अंगणवाडी भरवू नये, असा अहवाल दिला होता. दरम्यान, तिथेच नव्याने दुसरी इमारत बांधकाम सुरू आहे. त्यावर आता ८ लाख ५० हजार रुपये खर्च होत आहे. इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

जनतेच्या हितासाठी शासन लाखो रुपये खर्चत आहे; परंतु प्रत्यक्षात कामाचा दर्जा योग्य राहत नसल्याने त्यावर जिल्हा परिषदेने एक त्रिसदस्यीय समिती गठित केली. या चारही कामांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले. या समितीचा अहवाल अद्याप समोर आला नाही. या समितीतील एक अधिकारी चार महिन्यांपूर्वी निवृत्त झाला आहे.

चुकीच्या कामाला ब्रेक लावा...

विकास कामे ही गुणवत्तापूर्ण व्हावीत. जानवळ, सावरगाव, भाटसांगवी येथील प्रकरणे गंभीर आहेत. त्याचा चौकशी अहवाल समोर येत नाही. यातील दोषींविरुद्ध कारवाई व्हावी. जे जबाबदार आहेत, त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच आणून नुकसान भरपाई वसूल करावी.

- मिलिंद महालिंगे, माजी नगराध्यक्ष.

दोषींवर निलंबनाची कारवाई हवी...

बनसावरगाव व जनावळ येथील स्मशानभूमी, भाटसांगावी येथील अंगणवाडीवर जो खर्च झाला. तो दोषींकडून वसूल करावा, तसेच त्यांना निलंबित करावे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

- नागनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते.