शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

किसान ॲपपद्वारे दिली जाणारी माहिती दोन महिन्यापासून बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST

चाकूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात यंत्राचा वापर वाढला आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यापासून किसान ॲपच्या माध्यमातून शेतकरी ...

चाकूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात यंत्राचा वापर वाढला आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यापासून किसान ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिला जाणारा हवामानाचा अंदाज, पीक परिस्थिती, मार्गदर्शन आणि कृषी सल्ला बंद करण्यात आला आहे. दहा वर्षांपासून ही माहिती दिली जात होती. यामुळे शेतक-यांची गैरसोय होत आहे.

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती तसेच पीक पेरणीपासून ते थेट काढणीपर्यंतचे सखोल मार्गदर्शन, रोगराई नियंत्रण फवारणी यासंबंधी किसान ॲपच्या माध्यमातून मोबाईलवरुन मार्गदर्शन करण्यात येत होते. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व लातूर येथील मांजरा कृषी विकास केंद्राच्या वतीने कृषी सलंग्न माहिती देण्यात येत होती. यावर्षी जून महिन्यात किसान ॲपच्या वतीने हवामानाचे अंदाज उशीराने देण्यात आले. जूलै महिन्यापासून किसान ॲपवरुन देण्यात येणारे अंदाज बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पिकांवर पडलेल्या विविध रोगावर काय उपाययोजना करावी. हे यंदा शेतकरी बांधवांना समजून आले नाही. कृषीधारकांनी गळ्यात महागडी किटकनाषके घातली. ती फवारावी लागली.भारत कृषी प्रधान देश आहे.जय जवान जयकिसान चा नारा दिला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी बांधवांना पूर्वी दिल्या जाणा-या माहितीपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे शेतक-यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

किसान ॲपच्या माध्यमातून हवामान, पाऊस पाणी, पीक परिस्थिती, पिकांवरील रोगराई, उपाययोजना पीक पेरणी मार्गदर्शन दहा वर्षांपासून मिळत होते. आता बंद करण्यात आले आहे. शासनाने यात लक्ष घालून ही सर्व माहिती पूर्ववत देण्यास सुरुवात करावी. - नागनाथ पाटील, शेतकरी

किसान ॲपच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती पुन्हा सुरु करण्यात यावी. यासाठी कृषी विद्यापीठ परभणी यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - डी.एस. गावसाने, जिल्हा कृषी अधिकारी लातूर