शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

किसान ॲपपद्वारे दिली जाणारी माहिती दोन महिन्यापासून बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST

चाकूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात यंत्राचा वापर वाढला आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यापासून किसान ॲपच्या माध्यमातून शेतकरी ...

चाकूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात यंत्राचा वापर वाढला आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यापासून किसान ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिला जाणारा हवामानाचा अंदाज, पीक परिस्थिती, मार्गदर्शन आणि कृषी सल्ला बंद करण्यात आला आहे. दहा वर्षांपासून ही माहिती दिली जात होती. यामुळे शेतक-यांची गैरसोय होत आहे.

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती तसेच पीक पेरणीपासून ते थेट काढणीपर्यंतचे सखोल मार्गदर्शन, रोगराई नियंत्रण फवारणी यासंबंधी किसान ॲपच्या माध्यमातून मोबाईलवरुन मार्गदर्शन करण्यात येत होते. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व लातूर येथील मांजरा कृषी विकास केंद्राच्या वतीने कृषी सलंग्न माहिती देण्यात येत होती. यावर्षी जून महिन्यात किसान ॲपच्या वतीने हवामानाचे अंदाज उशीराने देण्यात आले. जूलै महिन्यापासून किसान ॲपवरुन देण्यात येणारे अंदाज बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पिकांवर पडलेल्या विविध रोगावर काय उपाययोजना करावी. हे यंदा शेतकरी बांधवांना समजून आले नाही. कृषीधारकांनी गळ्यात महागडी किटकनाषके घातली. ती फवारावी लागली.भारत कृषी प्रधान देश आहे.जय जवान जयकिसान चा नारा दिला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी बांधवांना पूर्वी दिल्या जाणा-या माहितीपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे शेतक-यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

किसान ॲपच्या माध्यमातून हवामान, पाऊस पाणी, पीक परिस्थिती, पिकांवरील रोगराई, उपाययोजना पीक पेरणी मार्गदर्शन दहा वर्षांपासून मिळत होते. आता बंद करण्यात आले आहे. शासनाने यात लक्ष घालून ही सर्व माहिती पूर्ववत देण्यास सुरुवात करावी. - नागनाथ पाटील, शेतकरी

किसान ॲपच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती पुन्हा सुरु करण्यात यावी. यासाठी कृषी विद्यापीठ परभणी यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - डी.एस. गावसाने, जिल्हा कृषी अधिकारी लातूर