शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आजारपण, शिक्षणाने कर्मचारी बेजार; ६३४ जणांचा स्वेच्छानिवृत्तीला नकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता ५० वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता ५० वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती याेजना जाहीर केली आहे. महाराष्ट्रात तब्बल लाखांच्या घरात कर्मचारी संख्या आहे. त्यातील २७ हजार कर्मचारी या याेजनेच्या कक्षात येतात. त्यामध्ये लातूर विभागातील एकूण पाच आगारांत ६७० कर्मचाऱ्यांचे ५० च्यावर वयाेमान आहे. मात्र, यातील तब्बल ६३४ कर्मचाऱ्यांनी या याेजनेला प्रतिसाद दिला नाही. अनेक कर्मचारी काैटुंबीक समस्या, शिक्षण, आई-वडिलांच्या आजारपणांनी बेजार आहे. अशा स्थितीत स्वेच्छानिवृत्ती घेणार कशी? असा सवाल उपस्थित केला आहे.

लातूर विभागातील एकूण पाच आगारातील केवळ ३७ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या याेजनेसाठी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये प्रशासकीय विभाग ३, यांत्रिकी शाखा २, वाहक ३ आणि चाल २९ अशा एकूण ३७ जणांचा समावेश आहे. महामंडळाकडून ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी ही याेजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अनेक कुटुंबांचा प्रपंच महामंडळाच्या नाेकरीवर अवलंबून आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न अद्यापही राहिलेले आहे तर अनेकांच्या घरात आई-बाबांचे आजारपण आहे. काही कर्मचारी आजही भाड्याच्याच घरात आपले वास्तव्य करतात. वय पन्नाशीच्या घरात पाेहोचले मात्र, काैटुंबिक प्रश्न अद्याप सुटले नाहीत. परिणामी, अनेकजण बेजार झाले आहेत.

स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागातील एकूण पाच आगारांत ३ हजार ५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या आहे. त्यातील ५० वर्ष ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ६७० च्या घरात आहे. या कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षाला ३ महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. शिवाय, जमा असलेला फंड आणि इतर सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. मात्र, या याेजनेच्या प्रस्तावाला एकूण ६७० पैकी तब्बल ६३४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे.