शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

शहरासह ग्रामीण भागात मास्क वापराकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या लाटेची अनेकांना झळ बसली आहे. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या लाटेची अनेकांना झळ बसली आहे. आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. काहींवर जीवाभावाची माणसे गमविण्याची वेळ आली. दरम्यान, शासन व प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित कोविड लसीकरणावर भर दिला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.

कोविडबाधितांची संख्या घटल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात गर्दी होऊ लागली आहे. प्रशासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. समारंभांना गर्दी वाढू लागली आहे. येत्या आगामी काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सण-उत्सव आहेत. त्यामुळे प्रत्येकाने शासन नियमांचे पालन करणे गरजेचे ठरत आहे.

ग्राम समित्या नावालाच...

निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांकडून कोविडसंदर्भात दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कोविडची तिसरी लाट रोखण्यासाठी ग्राम समित्या पुन्हा कार्यरत होणे आवश्यक आहे. जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स राखणे गरजेचे आहे. गाव पातळीवरील प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.