शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

जिल्ह्यातील पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार; उपाययोजनांची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनामुळे सतत कामाच्या तणावात असलेल्या पोलीस आरोग्य विभागातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा वाढतच आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोनामुळे सतत कामाच्या तणावात असलेल्या पोलीस आरोग्य विभागातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा वाढतच आहे. हा थकवा कमी करण्यासाठी ना सुटी मिळतेय, ना कुटुबीयांसाठी पुरेसा वेळ देता येतोय. त्यामुळे मानसिक थकवा घालविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुटी मिळणे कठीण झाले आहे. तर संचारबंदीत सतत रस्त्यावर कार्यरत राहून गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त कालावधी वाढला आहे. अशा स्थितीत मागील एक ते दीड वर्षांपासून हे कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. सेवा प्रथम, या ध्येयाने पोलीस आणि आरोग्य कर्मचारी आपली सेवा बजावीत आहेत; मात्र कोरोनामुळे कामाचे तास आणि ताण वाढला असल्याने मानसिक थकवा दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

संचारबंदीमुळे पोलीस दिवस-रात्र कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. त्यामुळे सामाजिक संस्थांच्या मदतीने हेल्पलाइनची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्याद्वारे बाधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जात होता. नवीन उपक्रम राबविण्याचा मानस आहे. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आरोग्य कर्मचारी सेवा बजावत आहेत. सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने कामाचा व्यापही वाढला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य निरोगी राहावे, ताण-तणाव कमी व्हावा, यासाठी विपश्यनाचा पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य विभाग अंमलबजावणी करीत आहे.

- डाॅ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी

आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विपश्यनाबाबत निर्णय झाला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे. कामाचा वेळ वाढला असल्याने थोडा थकवा आहे. उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- आरोग्य कर्मचारी

आम्ही सुरक्षित राहिलो तर आमचे कुटुंब सुरक्षित राहील. कामाचा ताण सहन करावा लागत असून, वेळही वाढविण्यात आला आहे. कमी कर्मचारी असताना अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे मानसिक थकवा दूर करण्याची गरज आहे. - आरोग्य कर्मचारी

संचारबंदीमुळे बंदोबस्तावर तैनात राहावे लागत आहे. काम आणि बंदोबस्तामुळे कुटुंबीयांना वेळही देणे अवघड झाले आहे. योगासने, प्राणायाम, मन शांत राहण्यासाठी वेगवेगळी शिबिरे घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

- पोलीस कर्मचारी

कामाचा ताण वाढल्याने किमान साप्ताहिक सुटी मिळणे गरजेचे आहे. तणावमुक्त राहण्यासाठी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. साप्ताहिक सुटी मिळाल्यास कुटुंबीयांसाठी वेळ देता येईल. योगा, प्राणायामचे वर्ग घेण्याची आवश्यकता आहे. - पोलीस कर्मचारी