शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अतिवृष्टीचा २२ गावांना फटका, ११ साठवण तलाव भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

दोन दिवसांपूर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील करंजी, सोनवळा, हळद वाढवणा, जिरगा, जंगमवाडी, डोंगरकोनाळी, ...

दोन दिवसांपूर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील

करंजी, सोनवळा, हळद वाढवणा, जिरगा, जंगमवाडी, डोंगरकोनाळी, गुत्ती १,२, धोंडेवाडी, वांजरवाडा, सिंदगी, माळहिप्परगा, रावणकोळा, डोंगरगाव, शेलदरा हे साठवण तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तालुक्यातील जवळपास दीडशे पाझर तलाव असून ते भरून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

घोणसी गटात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या भागातील नदी, नाले वाहू लागले आहेत. पाझर, साठवण तलाव भरले असून नदीला पूर आला आहे. या पावसाचा २२ गावांना फटका बसला आहे. अतनूरपासून वाहणाऱ्या नदीचे पाणी गावात घुसल्याने घराघरांत पाणी होते. त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

तसेच अतनूर, रावणकोळा, मेवापूर, चिंचोली, शिवाजीनगर तांडा, फकरुतांडा, सांगवी, गव्हाण, सुल्लाळी, डोंगरगाव आदी परिसरातील वाडी तांड्यावर पाणीच पाणी झाले होते. जवळपास ५०० एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वांजरवाडा परिसरात अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, उमाकांत इंगळे, अनिल ढोबळे, पांडुरंग परीट, दत्ता इंदुरे, अभंग मोरे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळ अधिकारी व्ही.एस. सूर्यवाड, तलाठी तानाजी भंडारे यांनी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली.

ओला दुष्काळ जाहीर करा...

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करावा. कर्जमाफी द्यावी. हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी आणि जळकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तालुक्यातील मोठ्या प्रकल्पासह पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात पूर्णपणे जलसाठा झाल्याने आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे.