शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मुक्तांगण स्कूलमध्ये अभिवादन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST

दयानंद कला महाविद्यालयात जयंती साजरी लातूर : दयानंद कला महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात ...

दयानंद कला महाविद्यालयात जयंती साजरी

लातूर : दयानंद कला महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. संदीपान जगदाळे, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. सुनीता सांगोले, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. रमेश पारवे, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, महेंद्र कोराळे, आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ३०५ रुग्णांवर उपचार सुरू

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या ३०५ जणांवर उपचार सुरू असून, त्यांपैकी १८३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने प्रयोगशाळेतील चाचण्या आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांवर भर दिला जात असून, दररोज १२०० हून अधिक चाचण्या केल्या जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

बंद असलेले सिग्नल सुुरू करण्याची मागणी

लातूर : शहरातील काही मुख्य चौकांतील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी होत आहे. एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौकात अवजड वाहनांची लगबग असते. त्यातच सिग्नल बंद असल्याने दुचाकीचालकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच रात्रीच्या वेळी याच चौकात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स बसेस थांबतात. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

नायलॉन मांजाची विक्री करण्यास बंदी

लातूर : जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या विक्रीस आणि साठवणुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. तसेच पोलीस विभागाने नागरी आणि ग्रामीण भागांत स्वतंत्र पथके तैनात करून नायलॉन मांजा विक्रीस प्रतिबंध घालावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मकरसंक्रातीनिमित्त पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. त्यामुळे अपघाताचा धोका असल्याने प्रतिबंध करण्यात आला आहे.

आंबा पिकावरील प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी करावी

लातूर : जिल्ह्यामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. आंबा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. या कीड व रोगामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. चाकूर, औसा, उदगीर व लातूर तालुक्यांत कृषी विभागाच्या वतीने कीड व रोगाचे नियतीपणे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून फवारणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रिंग रोड परिसरात रस्त्यावर पार्किंग

लातूर : एमआयडीसी परिसरातील रिंग रोड भागात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अनेकजण रस्त्याच्या कडेला दुचाकी वाहने पार्किंग करीत आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळी पादचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वाहने सुसाट धावतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. सदरील रस्त्यावरील पार्किंगकडे वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.