शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

हिरव्या मिरचीचे दर घसरले, १० रुपये किलोचा भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

चापोली : चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, भाव एकदम घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना ...

चापोली : चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, भाव एकदम घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. ठोक किरकोळ बाजारात केवळ १० ते १५ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.

बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रारंभी ५ ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचले होते. पंधरवड्यात ९०० ते ११०० रुपयांपर्यंत गडगडले. या दरात शेतकऱ्यांचा तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.

चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत मिरचीची लागवड केली आहे. उन्हाळ्यात मिरचीने शेतकऱ्यांना फायदा झाला. चांगला भाव मिळतो म्हणून मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून मिरचीची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात पाऊस झाल्याने मिरची लागवड केली, परंतु सध्याच्या स्थितीला नांदेड, निजामाबाद भागात मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

किलोस अंदाजे २२ रुपये खर्च...

मिरची रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्याला २२ ते २४ रुपये प्रति किलोपर्यंत अंदाजित खर्च येतो. यात तोडणी मजूर मिळत नाहीत आणि मिळालेच तर सध्या एक किलो मिरची तोडण्यासाठी ६ रुपये मजुरी घेतली जाते. बाजारात मिरचीला १० ते १५ रुपये किलो भाव आहे. तोडणी आणि वाहतूक खर्चाएवढाच भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

उत्पादनापेक्षा खर्च अधिक...

चापोली येथील बाजारात १५ रुपये किलो दराने हिरवी मिरची मिळत होती. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी २० रुपये किलो उत्पादन खर्च लागतो. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी रमाकांत स्वामी यांनी सांगितले.

नुकसान कमी करण्याचा प्रयत्न...

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करावा लागत आहे. तो विक्री न झाल्यास टाकून द्यावा लागेल. जो दर मिळेल, त्यातून किमान नुकसान कमी होईल, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी गंगाधर बावगे यांनी सांगितले.