शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
4
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
5
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
6
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
7
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
8
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
9
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
10
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
11
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
12
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
13
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
14
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
15
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
16
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
17
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
18
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
19
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
20
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील

हिरव्या मिरचीचे दर घसरले, १० रुपये किलोचा भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

चापोली : चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, भाव एकदम घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना ...

चापोली : चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, भाव एकदम घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. ठोक किरकोळ बाजारात केवळ १० ते १५ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.

बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रारंभी ५ ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचले होते. पंधरवड्यात ९०० ते ११०० रुपयांपर्यंत गडगडले. या दरात शेतकऱ्यांचा तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.

चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत मिरचीची लागवड केली आहे. उन्हाळ्यात मिरचीने शेतकऱ्यांना फायदा झाला. चांगला भाव मिळतो म्हणून मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून मिरचीची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात पाऊस झाल्याने मिरची लागवड केली, परंतु सध्याच्या स्थितीला नांदेड, निजामाबाद भागात मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

किलोस अंदाजे २२ रुपये खर्च...

मिरची रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्याला २२ ते २४ रुपये प्रति किलोपर्यंत अंदाजित खर्च येतो. यात तोडणी मजूर मिळत नाहीत आणि मिळालेच तर सध्या एक किलो मिरची तोडण्यासाठी ६ रुपये मजुरी घेतली जाते. बाजारात मिरचीला १० ते १५ रुपये किलो भाव आहे. तोडणी आणि वाहतूक खर्चाएवढाच भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

उत्पादनापेक्षा खर्च अधिक...

चापोली येथील बाजारात १५ रुपये किलो दराने हिरवी मिरची मिळत होती. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी २० रुपये किलो उत्पादन खर्च लागतो. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी रमाकांत स्वामी यांनी सांगितले.

नुकसान कमी करण्याचा प्रयत्न...

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करावा लागत आहे. तो विक्री न झाल्यास टाकून द्यावा लागेल. जो दर मिळेल, त्यातून किमान नुकसान कमी होईल, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी गंगाधर बावगे यांनी सांगितले.