शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या मिरचीचे दर घसरले, १० रुपये किलोचा भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

चापोली : चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, भाव एकदम घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना ...

चापोली : चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, भाव एकदम घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. ठोक किरकोळ बाजारात केवळ १० ते १५ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.

बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रारंभी ५ ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचले होते. पंधरवड्यात ९०० ते ११०० रुपयांपर्यंत गडगडले. या दरात शेतकऱ्यांचा तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.

चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत मिरचीची लागवड केली आहे. उन्हाळ्यात मिरचीने शेतकऱ्यांना फायदा झाला. चांगला भाव मिळतो म्हणून मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून मिरचीची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात पाऊस झाल्याने मिरची लागवड केली, परंतु सध्याच्या स्थितीला नांदेड, निजामाबाद भागात मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

किलोस अंदाजे २२ रुपये खर्च...

मिरची रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्याला २२ ते २४ रुपये प्रति किलोपर्यंत अंदाजित खर्च येतो. यात तोडणी मजूर मिळत नाहीत आणि मिळालेच तर सध्या एक किलो मिरची तोडण्यासाठी ६ रुपये मजुरी घेतली जाते. बाजारात मिरचीला १० ते १५ रुपये किलो भाव आहे. तोडणी आणि वाहतूक खर्चाएवढाच भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

उत्पादनापेक्षा खर्च अधिक...

चापोली येथील बाजारात १५ रुपये किलो दराने हिरवी मिरची मिळत होती. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी २० रुपये किलो उत्पादन खर्च लागतो. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी रमाकांत स्वामी यांनी सांगितले.

नुकसान कमी करण्याचा प्रयत्न...

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करावा लागत आहे. तो विक्री न झाल्यास टाकून द्यावा लागेल. जो दर मिळेल, त्यातून किमान नुकसान कमी होईल, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी गंगाधर बावगे यांनी सांगितले.