शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

हिरव्या मिरचीचे दर घसरले, १० रुपये किलोचा भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

चापोली : चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, भाव एकदम घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना ...

चापोली : चाकूर तालुक्यातील चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मात्र, भाव एकदम घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. ठोक किरकोळ बाजारात केवळ १० ते १५ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.

बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रारंभी ५ ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचले होते. पंधरवड्यात ९०० ते ११०० रुपयांपर्यंत गडगडले. या दरात शेतकऱ्यांचा तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.

चापोलीसह परिसरातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत मिरचीची लागवड केली आहे. उन्हाळ्यात मिरचीने शेतकऱ्यांना फायदा झाला. चांगला भाव मिळतो म्हणून मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून मिरचीची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात पाऊस झाल्याने मिरची लागवड केली, परंतु सध्याच्या स्थितीला नांदेड, निजामाबाद भागात मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

किलोस अंदाजे २२ रुपये खर्च...

मिरची रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्याला २२ ते २४ रुपये प्रति किलोपर्यंत अंदाजित खर्च येतो. यात तोडणी मजूर मिळत नाहीत आणि मिळालेच तर सध्या एक किलो मिरची तोडण्यासाठी ६ रुपये मजुरी घेतली जाते. बाजारात मिरचीला १० ते १५ रुपये किलो भाव आहे. तोडणी आणि वाहतूक खर्चाएवढाच भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

उत्पादनापेक्षा खर्च अधिक...

चापोली येथील बाजारात १५ रुपये किलो दराने हिरवी मिरची मिळत होती. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी २० रुपये किलो उत्पादन खर्च लागतो. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी रमाकांत स्वामी यांनी सांगितले.

नुकसान कमी करण्याचा प्रयत्न...

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करावा लागत आहे. तो विक्री न झाल्यास टाकून द्यावा लागेल. जो दर मिळेल, त्यातून किमान नुकसान कमी होईल, असे येथील मिरची उत्पादक शेतकरी गंगाधर बावगे यांनी सांगितले.