शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीचा बिगूल;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST

गाव पुढाऱ्यांची मोर्चेबांधणी लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारीला मतदान होणार ...

गाव पुढाऱ्यांची मोर्चेबांधणी

लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने गाव पुढाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरु असल्याने ग्रामीण राजकारण यंदाच्या निवडणुकीत चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्स्थाच्या निवडणुकीतही एकत्र लढण्याचा प्रयोग केला जाईल, अशी चर्चा आहे. लातूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या ४०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत हा प्रयोग राबविला जाईल का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघापैकी ४ विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे तर दोन मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. विधानसभेतील हे पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था सर्वाधिक भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व भाजप असे पॅनल आमने-सामने आले तर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र सध्या गावपुढाऱ्यांची पॅनल उभे करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असा आहे पक्षीय दबदबा...

चाकूर, देवणी, निलंगा, शिरुर अनंतपाळ पंचायत समिती व नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आहेत. लातूर जिल्हा परिषदही भाजपाच्या ताब्यात असून, लातूर मनपा मात्र काँग्रेसकडे आहे. जळकोट पं.स. काँग्रेस आणि नगरपंचायत भाजपाकडे. उदगीर पंचायत समिती राष्ट्रवादीकडे तर नगर परिषद भाजपाकडे आहे. औसा नगर परिषद राष्ट्रवादीकडे, तर पं.स. काँग्रेसकडे आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे बळ

स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या ताब्यात सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या संस्था आहेत. शिवसेनेचे या संस्थामध्ये काही सदस्य आहेत. त्यामुळे होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत पॅनलद्वारे लढल्या तर निश्चित महाविकास आघाडीचे बळ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र लढत चुरशीची होईल, असे चित्र दिसत आहे.