शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संघटनेच्या वादात खेळाडूंची होतेय गोची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क‌ लातूर : क्रीडा संघटनेतील वाद हे काही नवे नाहीत. स्वत:च्या स्वार्थासाठी व खुर्च‌ीच्या हव्यासापोटी संघटक खेळाडूंचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क‌

लातूर : क्रीडा संघटनेतील वाद हे काही नवे नाहीत. स्वत:च्या स्वार्थासाठी व खुर्च‌ीच्या हव्यासापोटी संघटक खेळाडूंचे हित जतन करत नाहीत. त्यामुळे याचा फटका डायरेक्ट त्या खेळावर व खेळाडूंवर होतो. मात्र, याचे त्यांना काही देणे-घेणे नाही. अशीच अवस्था गेल्या काही वर्ष‌ांत अनेक खेळांची झाली आहे. त्यामुळे खेळाडू बुचकळ्यात पडले आहेत. एकाच खेळाच्या दोन-दोन संघटना असल्याने खेळाडूंवर अन्याय होत आहे. मात्र, याचे देणे-घेणे कोणासही नाही.

अनेक खेळांच्या राष्ट्रीय व राज्य संघटनेत दुफळी आहे. या दोन्ही स्तरांवर एकेका खेळाच्या दोन-दोन संघटना कार्यरत आहेत. या दोन्ही संघटनेमार्फत स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन होते. मात्र, या दुफळीमुळे खेळाडूंचे अतोनात नुकसान होत आहे. खेळाडूंनाही कोणत्या संघटनेकडून खेळावे हा प्रश्न पडला आहे. ही बाब गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहे. मात्र, संघटनेमधील समेट काही घडेना. राज्य सरकारच्या क्रीडा खात्यानेही यामध्ये लक्ष घातले होते. मात्र, आजतागायत त्यास यश आले नाही. या दुफळीमुळे खेळाडूंची अवस्था तळ्यात-मळ्यात झाली आहे. खेळाडूंनाही कोणाकडून खेळावे, हे सुचेना. त्यामुळे त्यांचीही गोची झाली आहे. क्रीडा ग्रेस गुण, आरक्षण यासह विविध लाभांपासून खेळाडू वंचित राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच कयाकिंग, कनोईंग, तायक्वांदो व व्हाॅलिबाॅलच्या राज्य संघटनांवर कारवाई केली होती. मात्र, तरीही क्रीडा संघटनांचे सुधारण्याचे नाव नाही.

एकंदरित, या सर्व बाबींचा फटका खेळाडूंवर होत आहे. विविध गटांच्या स्पर्धेसह खुल्या गटातही एकाच खेळाच्या जिल्ह्यापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत दोन्ही गटांकडून स्पर्धा होत आहेत. त्यात मात्र खेळाडू भरडले जात आहेत. खेळ कसा वाढावा, खेळाडू कसे वाढावेत, स्पर्धेत कसा उत्तम संघ जाईल, यासह सराव शिबिर व खेळ विकासाच्या अन्य बाबींकडे लक्ष द्यायचे सोडून क्रीडा संघटक आपलीच पोळी भाजत आहेत. त्यामुळे क्रीडाक्षेत्राची हानी होत आहे. एकंदरित, खेळातील वाद मिटवून खेळ पुढे जावा, यासाठी खेळाडू आस लावून आहेत.

क्रीडा संघटकांनी खेळाडूंचे हित जोपासणे गरजेचे आहे. खेळ वाढीसाठी प्रयत्न करण्याचे सोडून आपापसांत मतभेद करणे चुकीचे आहे. यामुळे खेळ वाढीवर याचा परिणाम होतो. खेळाडूंमुळेच आपण आहोत, याचे भान न विसरता प्रयत्न करून आपसांतील वाद मिटवावेत, असे ऑलिम्पियन मुष्ठीयोद्धा शाहूराज बिराजदार म्हणाले.

संघटनेतील वादामुळे खेळाडूंची मानसिक स्थिती बिघडत आहे. कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हावे, याचेही कोडे आहे. दोन संघटना असल्याने पेच आहे. दोन्ही संघटना आम्हीच खरे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अडचण होते. आपसांतील वाद मिटवून खेळाडूंना न्याय द्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय व्हाॅलिबाॅलपटू मुजम्मील शेख याने व्यक्त केली.

व्हाॅलीबाॅल खेळात दोन-दोन स्पर्धा

क्रीडा संघटनेच्या माध्यमातून कोरोनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आहे. व्हाॅलिबाॅल खेळातही दोन संघटना आहेत. नुकत्याच या माध्यमातून सबज्युनिअर, ज्युनिअर व युथ या वयोगटांसाठी निवड चाचणी झाली असून, दोन्ही गटांच्या राज्य स्पर्धा या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे या खेळाचे खेळाडू संभ्रमात आहेत.

वेट्रन्स स्पर्धेतही दोन संघटना

ज्येष्ठ खेळाडूंसाठी घेण्यात येणाऱ्या वेट्रन्स स्पर्धेतही दोन संघटना कार्यरत झाल्या आहेत. एका संघटनेची स्पर्धा नाशिकला तर दुसऱ्या संघटनेची स्पर्धा अहमदनगर येथे होणार आहे.या संघटनेतही दुफळी झाल्याने ज्येष्ठ खेळाडू कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती ज्येष्ठ खेळाडूंनाही अनुभवावी लागत आहे.