शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

क्रीडा संघटनेच्या वादात खेळाडूंची होतेय गोची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क‌ लातूर : क्रीडा संघटनेतील वाद हे काही नवे नाहीत. स्वत:च्या स्वार्थासाठी व खुर्च‌ीच्या हव्यासापोटी संघटक खेळाडूंचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क‌

लातूर : क्रीडा संघटनेतील वाद हे काही नवे नाहीत. स्वत:च्या स्वार्थासाठी व खुर्च‌ीच्या हव्यासापोटी संघटक खेळाडूंचे हित जतन करत नाहीत. त्यामुळे याचा फटका डायरेक्ट त्या खेळावर व खेळाडूंवर होतो. मात्र, याचे त्यांना काही देणे-घेणे नाही. अशीच अवस्था गेल्या काही वर्ष‌ांत अनेक खेळांची झाली आहे. त्यामुळे खेळाडू बुचकळ्यात पडले आहेत. एकाच खेळाच्या दोन-दोन संघटना असल्याने खेळाडूंवर अन्याय होत आहे. मात्र, याचे देणे-घेणे कोणासही नाही.

अनेक खेळांच्या राष्ट्रीय व राज्य संघटनेत दुफळी आहे. या दोन्ही स्तरांवर एकेका खेळाच्या दोन-दोन संघटना कार्यरत आहेत. या दोन्ही संघटनेमार्फत स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन होते. मात्र, या दुफळीमुळे खेळाडूंचे अतोनात नुकसान होत आहे. खेळाडूंनाही कोणत्या संघटनेकडून खेळावे हा प्रश्न पडला आहे. ही बाब गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहे. मात्र, संघटनेमधील समेट काही घडेना. राज्य सरकारच्या क्रीडा खात्यानेही यामध्ये लक्ष घातले होते. मात्र, आजतागायत त्यास यश आले नाही. या दुफळीमुळे खेळाडूंची अवस्था तळ्यात-मळ्यात झाली आहे. खेळाडूंनाही कोणाकडून खेळावे, हे सुचेना. त्यामुळे त्यांचीही गोची झाली आहे. क्रीडा ग्रेस गुण, आरक्षण यासह विविध लाभांपासून खेळाडू वंचित राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच कयाकिंग, कनोईंग, तायक्वांदो व व्हाॅलिबाॅलच्या राज्य संघटनांवर कारवाई केली होती. मात्र, तरीही क्रीडा संघटनांचे सुधारण्याचे नाव नाही.

एकंदरित, या सर्व बाबींचा फटका खेळाडूंवर होत आहे. विविध गटांच्या स्पर्धेसह खुल्या गटातही एकाच खेळाच्या जिल्ह्यापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत दोन्ही गटांकडून स्पर्धा होत आहेत. त्यात मात्र खेळाडू भरडले जात आहेत. खेळ कसा वाढावा, खेळाडू कसे वाढावेत, स्पर्धेत कसा उत्तम संघ जाईल, यासह सराव शिबिर व खेळ विकासाच्या अन्य बाबींकडे लक्ष द्यायचे सोडून क्रीडा संघटक आपलीच पोळी भाजत आहेत. त्यामुळे क्रीडाक्षेत्राची हानी होत आहे. एकंदरित, खेळातील वाद मिटवून खेळ पुढे जावा, यासाठी खेळाडू आस लावून आहेत.

क्रीडा संघटकांनी खेळाडूंचे हित जोपासणे गरजेचे आहे. खेळ वाढीसाठी प्रयत्न करण्याचे सोडून आपापसांत मतभेद करणे चुकीचे आहे. यामुळे खेळ वाढीवर याचा परिणाम होतो. खेळाडूंमुळेच आपण आहोत, याचे भान न विसरता प्रयत्न करून आपसांतील वाद मिटवावेत, असे ऑलिम्पियन मुष्ठीयोद्धा शाहूराज बिराजदार म्हणाले.

संघटनेतील वादामुळे खेळाडूंची मानसिक स्थिती बिघडत आहे. कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हावे, याचेही कोडे आहे. दोन संघटना असल्याने पेच आहे. दोन्ही संघटना आम्हीच खरे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अडचण होते. आपसांतील वाद मिटवून खेळाडूंना न्याय द्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय व्हाॅलिबाॅलपटू मुजम्मील शेख याने व्यक्त केली.

व्हाॅलीबाॅल खेळात दोन-दोन स्पर्धा

क्रीडा संघटनेच्या माध्यमातून कोरोनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आहे. व्हाॅलिबाॅल खेळातही दोन संघटना आहेत. नुकत्याच या माध्यमातून सबज्युनिअर, ज्युनिअर व युथ या वयोगटांसाठी निवड चाचणी झाली असून, दोन्ही गटांच्या राज्य स्पर्धा या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे या खेळाचे खेळाडू संभ्रमात आहेत.

वेट्रन्स स्पर्धेतही दोन संघटना

ज्येष्ठ खेळाडूंसाठी घेण्यात येणाऱ्या वेट्रन्स स्पर्धेतही दोन संघटना कार्यरत झाल्या आहेत. एका संघटनेची स्पर्धा नाशिकला तर दुसऱ्या संघटनेची स्पर्धा अहमदनगर येथे होणार आहे.या संघटनेतही दुफळी झाल्याने ज्येष्ठ खेळाडू कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती ज्येष्ठ खेळाडूंनाही अनुभवावी लागत आहे.