शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

क्रीडा संघटनेच्या वादात खेळाडूंची होतेय गोची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क‌ लातूर : क्रीडा संघटनेतील वाद हे काही नवे नाहीत. स्वत:च्या स्वार्थासाठी व खुर्च‌ीच्या हव्यासापोटी संघटक खेळाडूंचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क‌

लातूर : क्रीडा संघटनेतील वाद हे काही नवे नाहीत. स्वत:च्या स्वार्थासाठी व खुर्च‌ीच्या हव्यासापोटी संघटक खेळाडूंचे हित जतन करत नाहीत. त्यामुळे याचा फटका डायरेक्ट त्या खेळावर व खेळाडूंवर होतो. मात्र, याचे त्यांना काही देणे-घेणे नाही. अशीच अवस्था गेल्या काही वर्ष‌ांत अनेक खेळांची झाली आहे. त्यामुळे खेळाडू बुचकळ्यात पडले आहेत. एकाच खेळाच्या दोन-दोन संघटना असल्याने खेळाडूंवर अन्याय होत आहे. मात्र, याचे देणे-घेणे कोणासही नाही.

अनेक खेळांच्या राष्ट्रीय व राज्य संघटनेत दुफळी आहे. या दोन्ही स्तरांवर एकेका खेळाच्या दोन-दोन संघटना कार्यरत आहेत. या दोन्ही संघटनेमार्फत स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन होते. मात्र, या दुफळीमुळे खेळाडूंचे अतोनात नुकसान होत आहे. खेळाडूंनाही कोणत्या संघटनेकडून खेळावे हा प्रश्न पडला आहे. ही बाब गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहे. मात्र, संघटनेमधील समेट काही घडेना. राज्य सरकारच्या क्रीडा खात्यानेही यामध्ये लक्ष घातले होते. मात्र, आजतागायत त्यास यश आले नाही. या दुफळीमुळे खेळाडूंची अवस्था तळ्यात-मळ्यात झाली आहे. खेळाडूंनाही कोणाकडून खेळावे, हे सुचेना. त्यामुळे त्यांचीही गोची झाली आहे. क्रीडा ग्रेस गुण, आरक्षण यासह विविध लाभांपासून खेळाडू वंचित राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच कयाकिंग, कनोईंग, तायक्वांदो व व्हाॅलिबाॅलच्या राज्य संघटनांवर कारवाई केली होती. मात्र, तरीही क्रीडा संघटनांचे सुधारण्याचे नाव नाही.

एकंदरित, या सर्व बाबींचा फटका खेळाडूंवर होत आहे. विविध गटांच्या स्पर्धेसह खुल्या गटातही एकाच खेळाच्या जिल्ह्यापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत दोन्ही गटांकडून स्पर्धा होत आहेत. त्यात मात्र खेळाडू भरडले जात आहेत. खेळ कसा वाढावा, खेळाडू कसे वाढावेत, स्पर्धेत कसा उत्तम संघ जाईल, यासह सराव शिबिर व खेळ विकासाच्या अन्य बाबींकडे लक्ष द्यायचे सोडून क्रीडा संघटक आपलीच पोळी भाजत आहेत. त्यामुळे क्रीडाक्षेत्राची हानी होत आहे. एकंदरित, खेळातील वाद मिटवून खेळ पुढे जावा, यासाठी खेळाडू आस लावून आहेत.

क्रीडा संघटकांनी खेळाडूंचे हित जोपासणे गरजेचे आहे. खेळ वाढीसाठी प्रयत्न करण्याचे सोडून आपापसांत मतभेद करणे चुकीचे आहे. यामुळे खेळ वाढीवर याचा परिणाम होतो. खेळाडूंमुळेच आपण आहोत, याचे भान न विसरता प्रयत्न करून आपसांतील वाद मिटवावेत, असे ऑलिम्पियन मुष्ठीयोद्धा शाहूराज बिराजदार म्हणाले.

संघटनेतील वादामुळे खेळाडूंची मानसिक स्थिती बिघडत आहे. कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हावे, याचेही कोडे आहे. दोन संघटना असल्याने पेच आहे. दोन्ही संघटना आम्हीच खरे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अडचण होते. आपसांतील वाद मिटवून खेळाडूंना न्याय द्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय व्हाॅलिबाॅलपटू मुजम्मील शेख याने व्यक्त केली.

व्हाॅलीबाॅल खेळात दोन-दोन स्पर्धा

क्रीडा संघटनेच्या माध्यमातून कोरोनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आहे. व्हाॅलिबाॅल खेळातही दोन संघटना आहेत. नुकत्याच या माध्यमातून सबज्युनिअर, ज्युनिअर व युथ या वयोगटांसाठी निवड चाचणी झाली असून, दोन्ही गटांच्या राज्य स्पर्धा या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे या खेळाचे खेळाडू संभ्रमात आहेत.

वेट्रन्स स्पर्धेतही दोन संघटना

ज्येष्ठ खेळाडूंसाठी घेण्यात येणाऱ्या वेट्रन्स स्पर्धेतही दोन संघटना कार्यरत झाल्या आहेत. एका संघटनेची स्पर्धा नाशिकला तर दुसऱ्या संघटनेची स्पर्धा अहमदनगर येथे होणार आहे.या संघटनेतही दुफळी झाल्याने ज्येष्ठ खेळाडू कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती ज्येष्ठ खेळाडूंनाही अनुभवावी लागत आहे.