शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

डंम्पिंग ग्राऊंडवर पोहोचला कचरा

By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST

लातूर : डंम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर लातूर शहरातील कचरा गेल्या १२ दिवसांपासून ठप्प झाला होता़

लातूर : डंम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर लातूर शहरातील कचरा गेल्या १२ दिवसांपासून ठप्प झाला होता़ शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग अन् दुर्गंधीचा सामना करावा लागणाऱ्या शहरवासियांना मंगळवारी दिलासा मिळाला आहे़ स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कचरा उचलण्यास प्रारंभ केला असून दिवसभरात जवळपास १५० टन कचरा शहरातून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला आहे़ लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून भेडसावत आहे़ वरवंटी, नांदगाव, बसवंतपूर येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला विरोध केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे़ डेपोवर लागणारी आग, पावसाळ्यातील दुर्गंधी, मोकाट कुत्र्यांचा वावर, प्लास्टिकमुळे शेती नापिक होत असल्याचा त्रासास कंटाळून ग्रामस्थ हरित न्यायालयात गेले आहेत़ (प्रतिनिधी)१२ दिवसांपूर्वी कचरा डेपोस आग लागली़ धुरामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कचरा भरून आलेली वाहने पिटाळून लावत तीव्र विरोध सुरू केला़ मनपा प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात मार्गच निघत नसल्याने अखेर पोलिस संरक्षणात कचरा टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता़ मात्र, तोही मार्ग यशस्वी झाला नाही़ अखेर माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्याने हे प्रकरण तुर्तास तरी निवळले आहे़ त्यामुळे कचरा उचलायला सुरूवात झाली असली तरी १२ दिवसांत जमा झालेला कचरा आठ दिवसांत पूर्णपणे उचलला जाईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ त्यामुळे आणखी आठ दिवस कचऱ्याचा त्रास सहन करावा लागेल़कचऱ्यामुळे दुर्गंधी़़़मंगळवारी सकाळी महानगरपालिकेतील स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रेन मार्केट, गंजगोलाई, रिंगरोड, फ्रूट मार्केट आदी भागात ठप्प झालेला कचरा उचलण्यास प्रारंभ केला़ दिवभरात डंम्पिंग ग्राऊंडवर जवळपास ८० गाड्या कचरा टाकण्यात आला आहे़ शहरात सध्या हजारो टन कचरा पडला असला तरी आठ दिवसांत ठप्प झालेला सर्व कचरा उचलला जाईल, दिवभरात जवळपास १५० टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक राऊत यांनी सांगितले़ ४गेल्या आठ दिवसांपासून प्रशासन व ग्रामस्थांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते़ मात्र, ग्रामस्थांचे समाधान करण्यात प्रशासनाला यश आले नाही़ अखेर माजी राज्यमंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांनी कचराप्रश्नी मध्यस्थी केल्याने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला़