शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जिल्ह्यातील २०० गावांत कचरा संकलन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

उस्मानाबाद : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्ह्यात दोन टप्प्यांत २०० गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला ...

उस्मानाबाद : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्ह्यात दोन टप्प्यांत २०० गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून गावांत कचरा संकलन केंद्र, घंटागाडी, प्रत्येक घरी दोन कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ६२ ते ६३ कोटींची तरतूद आहे.

आजही अनेक गावांत सांडपाण्याची व्यवस्था नसते. पाणी रस्त्यावरून वाहते. मोक्याच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी याकरिता १६ संस्था नियुक्त केल्या आहेत. या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील २०० गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५५ तर दुसऱ्या टप्प्यात १४५ गावांत कामे केली जाणार आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून ६२ ते ६३ कोटींची तरतूद केली आहे.

या निधीतून प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबासाठी दोन कचराकुंड्या पुरविण्यात येतील. डोअर टु डोअर कचरा संकलनासाठी बॅटरीवर चालणारी घंटागाडी, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू नयेत यासाठी सार्वजनिक कचराकुंडी, प्रत्येक घरासाठी शोषखड्डा तसेच वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयेही उभारण्यात येणार आहेत. एवढेच नाहीतर, प्रत्येक गावात कचरा संकलन केंद्रही उभारले जाणार आहे.

चौकट...

प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र...

२०० गावांत कचरा संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या केंद्रांत संकलित होणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण केले जाईल. यातून निघणारा प्लास्टिक कचरा एकत्रित करून तालुक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचरा प्रोसेसिंग युनिटला पाठविला जाईल. अशा एका युनिटवर १६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे युनिट असेल.

...तर पीव्हीसी पाइप गटार

पाच हजार व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी पीव्हीसी पाइप गटार योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अशा गावातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

कोट....

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील ५५ गावांची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच कामे सुरू होतील. हा प्रकल्प राबविण्यासाठी १६ संस्थांची निवड केली आहे.

- अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.