शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरीच्या लॉटरीची शेतकऱ्यांना लागली उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST

राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावावे, म्हणून राज्य शासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब ...

राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावावे, म्हणून राज्य शासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. त्यासाठी पूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येत होते. मात्र, दोन वर्षांपासून हे प्रस्ताव ऑनलाइनरीत्या दाखल करण्यात येत आहेत.

या योजनेंतर्गत नवीन सिंचन विहीर खोदकामासाठी अडीच लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार, इनवेल बोअरिंगसाठी २० हजार, पंपसंचासाठी २० हजार, वीजजोडणीसाठी १० हजार, शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरणासाठी १ लाख, सूक्ष्म संच ठिबक संचासाठी ५० हजार, तुषार संचासाठी २५ हजार असे अनुदान देण्यात येते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींमुळे शासनाने सन २०२०-२१ या वर्षात सदरील योजनेस तात्पुरती स्थगिती दिली. मात्र, त्यापूर्वी महाडीबीटीवर ऑनलाइन प्रस्ताव मागविले. जिल्ह्यातून सिंचन विहिरीसाठी ४६५ तर अन्य कामांसाठी ६०७ प्रस्ताव दाखल केले. दरम्यान, शासनाने स्थगिती उठविली. मात्र, अद्यापही निवडीसाठी लॉटरी प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे सदरील प्रवर्गातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यास ९ कोटी मंजूर...

सदरील योजनेंतर्गत जिल्ह्यास ९ कोटी ३५ लाख मंजूर झाले आहेत. त्यातून जवळपास ३०० विहिरींची कामे होणे अपेक्षित आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांत जिल्ह्यात २६८ नवीन विहिरींचे खोदकाम करण्यात आले आहे.

लवकरच लॉटरी निघेल...

जिल्ह्यातून यंदा एकूण १ हजार ७२ शेतकऱ्यांचे ऑनलाइन प्रस्ताव दाखल झाले आहेत. दोन वर्षांसाठी ही योजना असून, लवकरच लॉटरी पद्धतीने निवड होईल, तसेच मागील वर्षातील ४७ विहिरींची कामे अपूर्ण असल्याने संबंधित शेतकऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी, जि.प.

कामासाठी कालावधी कमी...

सदरील योजनेअंतर्गत विहीर खोदकामासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला असला, तरी वर्षअखेरीस स्थगिती उठविण्यात आली आहे. अजूनही निवड प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे निवड होणाऱ्या लाभार्थ्यांना वर्ष-सव्वा वर्षात खोदकाम करावे लागणार असल्याने, शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.