शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शॉप अ‍ॅक्टचा परवाना घेण्याकडेही कानाडोळा !

By admin | Updated: May 7, 2014 23:48 IST

लातूर : पॅकबंद पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बहुतांश व्यावसायिकांकडे शॉप अ‍ॅक्टचाही परवाना नाही़ परवाना देणार्‍या कोणत्याही शासन विभागाकडे या व्यावसायिकांची नोंदच नाही़

लातूर : पॅकबंद पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बहुतांश व्यावसायिकांकडे शॉप अ‍ॅक्टचाही परवाना नाही़ परवाना देणार्‍या कोणत्याही शासन विभागाकडे या व्यावसायिकांची नोंदच नाही़ तरीही जारद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय त्यांच्याकडून खुलेआम सुरू आहे़ ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जारद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांची यादीच घेतली आहे़ दरम्यान, मनपा आणि अन्न व औषधी प्रशासन संयुक्त मोहीम राबवून संबंधितांवर कारवाई करणार आहेत़ लातूर शहरासह जिल्ह्यात जारच्या साह्याने सीलंबद पाणी विक्रीचा व्यवसाय करण्यात येत आहे़ या पाण्याच्या कुठल्याही चाचण्या केल्या जात नाहीत़ बोअर, विहीर व पत्र्याच्या शेडमध्ये हा व्यवसाय थाटला आहे़ सुरूवातीला असे व्यावसायिक टँकर, बैलगाडी टँकरद्वारे पाणी विक्रत होते़ आता त्यांनी या व्यवसायाचे आधुनिकीकरण करून जारमध्ये पाणी भरून तो जार सीलबंद करून विकला जात आहे़ यात व्यावसायिकांना मोठा फायदा होत आहे़ मात्र जारमधील पाणी शंभर टक्के शुद्ध असल्याची खात्री देता येत नाही़ शास्त्रीय पद्धतीने या पाण्याचे शुद्धीकरण केले की नाही याची कसलीही पडताळणी कोणीही करत नाही़ ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर मनपाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन जागे झाले आहे़ बुधवारी सकाळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ़महेश पाटील यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागात जाऊन तेथील अधिकार्‍यांची भेट घेतली़ मात्र या विभागाचे सहायक आयुक्त औरंगाबादला शासकीय कामानिमित्त गेल्यामुळे ठोस निर्णय होऊ शकला नाही़ गुरूवारी ते लातुरात आल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी व अन्न व औषधी विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक होवून यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे़ दरम्यान, मनपाच्या आरोग्य विभागाने ‘लोकमत’शी भ्रमणध्वनीवर संवाद साधून अशा व्यावसायिकांची यादी देण्याची विनंती केली़ त्यानुसार त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवून ‘लोकमत’कडून यादी घेतली आहे़ (प्रतिनिधी) जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रानंतर प्रशासन कामाला़़़ स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने जारमधील पाणी योग्य आहे की नाही, याची तपासणी अन्न व औषधी प्रशासनाने सुरू केली आहे़ जारमधील पाणी बोअरचे असेल ते दीडशे फुटापेक्षा खालचे आहे की वरचे आहे़ ते कार्पोरेशनचे पाणी आहे की स्वत:चे आहे, या सर्व बाबींचा शोध अन्न व औषधी प्रशासन तसेच मनपाचे अधिकारी घेणार आहेत़ झोनप्रमाणे तपासणी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करून पाणी विक्री व्यावसायिकांचा पंचनामा केला जाणार आहे़ यात दोष आढळला तर कारवाई करण्यात येणार आहे़ जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी अन्न व औषधी प्रशासनाला कालच पत्र देवून आदेश दिले आहेत़ तीन दिवसांत जारद्वारे पाणी विक्री करणार्‍या व्यावसायिकांची पडताळणी करा आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करा, असे फर्मान जिल्हाधिकारी डॉ़ शर्मा यांनी काढले आहे़ त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाचे कर्मचारी कामाला लागले आहेत़