शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शॉप अ‍ॅक्टचा परवाना घेण्याकडेही कानाडोळा !

By admin | Updated: May 7, 2014 23:48 IST

लातूर : पॅकबंद पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बहुतांश व्यावसायिकांकडे शॉप अ‍ॅक्टचाही परवाना नाही़ परवाना देणार्‍या कोणत्याही शासन विभागाकडे या व्यावसायिकांची नोंदच नाही़

लातूर : पॅकबंद पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बहुतांश व्यावसायिकांकडे शॉप अ‍ॅक्टचाही परवाना नाही़ परवाना देणार्‍या कोणत्याही शासन विभागाकडे या व्यावसायिकांची नोंदच नाही़ तरीही जारद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय त्यांच्याकडून खुलेआम सुरू आहे़ ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जारद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांची यादीच घेतली आहे़ दरम्यान, मनपा आणि अन्न व औषधी प्रशासन संयुक्त मोहीम राबवून संबंधितांवर कारवाई करणार आहेत़ लातूर शहरासह जिल्ह्यात जारच्या साह्याने सीलंबद पाणी विक्रीचा व्यवसाय करण्यात येत आहे़ या पाण्याच्या कुठल्याही चाचण्या केल्या जात नाहीत़ बोअर, विहीर व पत्र्याच्या शेडमध्ये हा व्यवसाय थाटला आहे़ सुरूवातीला असे व्यावसायिक टँकर, बैलगाडी टँकरद्वारे पाणी विक्रत होते़ आता त्यांनी या व्यवसायाचे आधुनिकीकरण करून जारमध्ये पाणी भरून तो जार सीलबंद करून विकला जात आहे़ यात व्यावसायिकांना मोठा फायदा होत आहे़ मात्र जारमधील पाणी शंभर टक्के शुद्ध असल्याची खात्री देता येत नाही़ शास्त्रीय पद्धतीने या पाण्याचे शुद्धीकरण केले की नाही याची कसलीही पडताळणी कोणीही करत नाही़ ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर मनपाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन जागे झाले आहे़ बुधवारी सकाळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ़महेश पाटील यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागात जाऊन तेथील अधिकार्‍यांची भेट घेतली़ मात्र या विभागाचे सहायक आयुक्त औरंगाबादला शासकीय कामानिमित्त गेल्यामुळे ठोस निर्णय होऊ शकला नाही़ गुरूवारी ते लातुरात आल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी व अन्न व औषधी विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक होवून यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे़ दरम्यान, मनपाच्या आरोग्य विभागाने ‘लोकमत’शी भ्रमणध्वनीवर संवाद साधून अशा व्यावसायिकांची यादी देण्याची विनंती केली़ त्यानुसार त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवून ‘लोकमत’कडून यादी घेतली आहे़ (प्रतिनिधी) जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रानंतर प्रशासन कामाला़़़ स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने जारमधील पाणी योग्य आहे की नाही, याची तपासणी अन्न व औषधी प्रशासनाने सुरू केली आहे़ जारमधील पाणी बोअरचे असेल ते दीडशे फुटापेक्षा खालचे आहे की वरचे आहे़ ते कार्पोरेशनचे पाणी आहे की स्वत:चे आहे, या सर्व बाबींचा शोध अन्न व औषधी प्रशासन तसेच मनपाचे अधिकारी घेणार आहेत़ झोनप्रमाणे तपासणी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करून पाणी विक्री व्यावसायिकांचा पंचनामा केला जाणार आहे़ यात दोष आढळला तर कारवाई करण्यात येणार आहे़ जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी अन्न व औषधी प्रशासनाला कालच पत्र देवून आदेश दिले आहेत़ तीन दिवसांत जारद्वारे पाणी विक्री करणार्‍या व्यावसायिकांची पडताळणी करा आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करा, असे फर्मान जिल्हाधिकारी डॉ़ शर्मा यांनी काढले आहे़ त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाचे कर्मचारी कामाला लागले आहेत़