शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

शॉप अ‍ॅक्टचा परवाना घेण्याकडेही कानाडोळा !

By admin | Updated: May 7, 2014 23:48 IST

लातूर : पॅकबंद पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बहुतांश व्यावसायिकांकडे शॉप अ‍ॅक्टचाही परवाना नाही़ परवाना देणार्‍या कोणत्याही शासन विभागाकडे या व्यावसायिकांची नोंदच नाही़

लातूर : पॅकबंद पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बहुतांश व्यावसायिकांकडे शॉप अ‍ॅक्टचाही परवाना नाही़ परवाना देणार्‍या कोणत्याही शासन विभागाकडे या व्यावसायिकांची नोंदच नाही़ तरीही जारद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय त्यांच्याकडून खुलेआम सुरू आहे़ ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जारद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांची यादीच घेतली आहे़ दरम्यान, मनपा आणि अन्न व औषधी प्रशासन संयुक्त मोहीम राबवून संबंधितांवर कारवाई करणार आहेत़ लातूर शहरासह जिल्ह्यात जारच्या साह्याने सीलंबद पाणी विक्रीचा व्यवसाय करण्यात येत आहे़ या पाण्याच्या कुठल्याही चाचण्या केल्या जात नाहीत़ बोअर, विहीर व पत्र्याच्या शेडमध्ये हा व्यवसाय थाटला आहे़ सुरूवातीला असे व्यावसायिक टँकर, बैलगाडी टँकरद्वारे पाणी विक्रत होते़ आता त्यांनी या व्यवसायाचे आधुनिकीकरण करून जारमध्ये पाणी भरून तो जार सीलबंद करून विकला जात आहे़ यात व्यावसायिकांना मोठा फायदा होत आहे़ मात्र जारमधील पाणी शंभर टक्के शुद्ध असल्याची खात्री देता येत नाही़ शास्त्रीय पद्धतीने या पाण्याचे शुद्धीकरण केले की नाही याची कसलीही पडताळणी कोणीही करत नाही़ ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर मनपाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन जागे झाले आहे़ बुधवारी सकाळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ़महेश पाटील यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागात जाऊन तेथील अधिकार्‍यांची भेट घेतली़ मात्र या विभागाचे सहायक आयुक्त औरंगाबादला शासकीय कामानिमित्त गेल्यामुळे ठोस निर्णय होऊ शकला नाही़ गुरूवारी ते लातुरात आल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी व अन्न व औषधी विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक होवून यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे़ दरम्यान, मनपाच्या आरोग्य विभागाने ‘लोकमत’शी भ्रमणध्वनीवर संवाद साधून अशा व्यावसायिकांची यादी देण्याची विनंती केली़ त्यानुसार त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवून ‘लोकमत’कडून यादी घेतली आहे़ (प्रतिनिधी) जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रानंतर प्रशासन कामाला़़़ स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने जारमधील पाणी योग्य आहे की नाही, याची तपासणी अन्न व औषधी प्रशासनाने सुरू केली आहे़ जारमधील पाणी बोअरचे असेल ते दीडशे फुटापेक्षा खालचे आहे की वरचे आहे़ ते कार्पोरेशनचे पाणी आहे की स्वत:चे आहे, या सर्व बाबींचा शोध अन्न व औषधी प्रशासन तसेच मनपाचे अधिकारी घेणार आहेत़ झोनप्रमाणे तपासणी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करून पाणी विक्री व्यावसायिकांचा पंचनामा केला जाणार आहे़ यात दोष आढळला तर कारवाई करण्यात येणार आहे़ जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी अन्न व औषधी प्रशासनाला कालच पत्र देवून आदेश दिले आहेत़ तीन दिवसांत जारद्वारे पाणी विक्री करणार्‍या व्यावसायिकांची पडताळणी करा आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करा, असे फर्मान जिल्हाधिकारी डॉ़ शर्मा यांनी काढले आहे़ त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाचे कर्मचारी कामाला लागले आहेत़