शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पावसामुळे महामार्गावर खड्डेच खड्डे, वाहन चालविणे कसरतीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

चाकूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील काही महिन्यांपूर्वी खड्डे बुजविण्यात आले. परंतु, छोटे खड्डे व्यवस्थित न बुजविल्याने आणि पावसामुळे ...

चाकूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील काही महिन्यांपूर्वी खड्डे बुजविण्यात आले. परंतु, छोटे खड्डे व्यवस्थित न बुजविल्याने आणि पावसामुळे त्या खड्ड्यांचा आकार वाढला आहे. रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना वाहन चालविणे धोकादायक झाले असून अपघात वाढले आहेत. परिणामी, दुचाकीस्वार चाकूर ते लातूर हा प्रवास टाळत आहेत. तसेच चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहन चालविणे ही तारेवरची कसरत ठरत आहे.

चाकूर- लातूर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डयांची खोली जवळपास ९ ते १५ इंच तर रुंदी तीन ते सात फुट ऐवढी आहे. खड्ड्यात वाहने आदळल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. खड्डे चुकविण्याचा प्रयत्न केला तर अपघात होत आहेत. शहरातील जुने बसस्थानकाजवळ खड्डे पडल्याने ते चुकविताना वाहतुकीची कोंडी होत आहे. पुढे पूल, पेट्रोलपंप, न्यायालय, तहसील येथील रस्त्यावरही खड्डेच खड्डे आहेत. खड्डयांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार पडून अपघात होत आहेत.

तुळजापूर- लातूर- चाकूर- अहमदपूर- नांदेड रस्ता राज्य शासनाने केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला. त्यानंतर या मार्गावर कोट्यवधी रुपये खर्चून हॉटमिक्सचे काम करण्यात आले. हे काम करण्यापूर्वी निविदा काढून खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, खड्डे व्यवस्थित न बुजविल्याने त्यावरील हॉटमिक्सचे काम फारसे तग धरले नाही. परिणामी, पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.

चाकुरातील शासकीय विश्रामगृह ते विश्व शांतीधाम मंदिर आणि चाकूर ते तहसील कचेरी हा रस्ता दुपरी नसल्याने येथे हॉटमिक्सचे काम झाले नव्हते. त्याची साईडपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गने केंद्र सरकारकडे पाठविला. मात्र, तो अद्याप लालफितीत अडकला आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

लातूररोडच्यासमोर घरणी गावानजिक, शासकीय विश्रामगृह, नळेगाव टी पॉईंट, नांदगाव, आष्टा, महाळंग्रा, ममदापूर, कोळपा पुलानजिक असे लातूरपर्यंत खड्डेच- खड्डे आहेत. खड्डे बुजविण्याचे काम दर्जेदार होत नाही. त्यामुळे करण्यात आलेले काम पुन्हा उखडत आहे.

खड्ड्यांनजिक लाल फलक...

या मार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे होत आहेत. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचत आहे. त्यामुळे खड्डयांचा अंदाज येत नाही. सतत अपघात होत असल्याने खड्डयाजवळ अजय घोडके, योगेश पाटील, किशोर आंधुरे यांनी लाल फलक लावले आहेत.

तात्काळ सूचना करु...

या मार्गासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांना पत्र देऊन जुन्या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहन चालकांसाठी सोयीचे करावे. खड्ड्यांमुळे अपघात होत असून त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर आहे.

- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.

दुरुस्तीसाठी रस्त्यावर येऊ...

राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांमुळे अपघात होत आहेत. रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे अजित घंटेवाड, अजय धनेश्वर, विठ्ठल झांबरे, परमेश्वर नवरखेले, लक्ष्मण डाके, दत्ता सूर्यवंशी, सत्यनारायण कोळेकर यांनी सांगितले.