शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरडी आभाळमाया..!

By admin | Updated: July 22, 2014 00:16 IST

रमेश शिंदे , औसा पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना उलटला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.

रमेश शिंदे , औसापावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना उलटला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये अजूनही पेरण्या झाल्या नाहीत. पेरण्या झालेले ५० टक्के क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नाही. जे उगवले त्यांना आता पावसाची गरज आहे. परंतु, दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री चांदणे पडत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर दुष्काळाचे काजवे चमकू लागले आहेत़ जून महिना कोरडा गेला. जुलैमध्ये एकवेळा बऱ्यापैकी तर दोन-तीन वेळा अल्प पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. त्यातही सोयाबीनच्या बियाणाने मोठा दगा दिला. तालुक्यातील जवळपास २५ हजार हेक्टर्स क्षेत्रावरील सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणी करावी लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा दिसून येत आहे. तालुक्यावर दिवसभर दाटून येणारे ढग बरसत नाहीत. ते आता पावसाचे नव्हे, तर दुष्काळाचे संकेत देऊ लागले आहेत. पाणीटंचाई कायम आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुबार पेरण्या कराव्या लागत आहेत. आता पाऊस नाही आला तर काय होणार, या भीतीने सर्वांच्याच मनात काहूर निर्माण झाले आहे.औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. पेरण्यांना तब्बल महिनाभर उशीर होऊनही शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने काळ्या आईची ओटी भरली. ७० ते ८० हजार हेक्टर्स क्षेत्रावर पेरण्या उरकल्या; पण आता पाऊसच नाही. वर्षभर औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाने छळले. आधी अवकाळी, त्यानंतर गारपीट तर आता पुन्हा दुष्काळाचे गडद सावट दिसत आहे़ त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जवळचे सर्व काही संपले. बँका आणि खाजगी सावकाराच्या कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे आता शेतकरी हतबल होताना दिसत आहे. मागील वर्षी औसा तालुक्यात २१ जुलैपर्यंत २६१ मि.मी. पाऊस झाला होता. पण यावर्षी मात्र आजपर्यंत केवळ १२४.१४ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ८१३.०९ मि.मी. इतकी आहे. यावर्षी पावसाळ्याचे जवळपास ४० ते ४५ दिवस संपले, तरीही अत्यंत तोकडा पाऊस झाला आहे. तालुक्यातील आशिव, मातोळा, उजनी या पट्ट्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे दिवसभर ढग असले तरी ढगांची कोरडीच माया दिसत आहे. सध्या तालुक्यातील १० गावे व २ वाडी-तांड्यांवर १९ अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. अजून चार दिवस पाऊस नाही झाला तर आणखी गावांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. पाऊस नसल्यामुळे पाणीटंचाई अजूनही कायम आहे. दिवसभर आभाळात ढगांची गर्दी असते. पाऊस मात्र पडत नाही. रात्री चांदण्या दिसतात. दिवसभर आभाळात ढग दिसत असले तरी ‘ढगांची कोरडी माया, दुष्काळाची गडद छाया’ असे चित्र आता औसा तालुक्यात स्पष्ट दिसत आहे.चारा आणि पाणीटंचाईला प्राधान्य...सध्याच्या परिस्थितीसंदर्भात तहसीलदार दत्ता भारस्कर म्हणाले की, जिल्हास्तरावरून दुष्काळाचा सामना करण्याचे नियोजन तयार आहे. सध्या तालुक्यातील पाणीटंचाई आणि जनावरांसाठी चाराटंचाई या दोन प्रश्नांवर दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे दोन्ही प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असल्याचे भारस्कर यांनी सांगितले.