शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

कोरडी आभाळमाया..!

By admin | Updated: July 22, 2014 00:16 IST

रमेश शिंदे , औसा पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना उलटला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.

रमेश शिंदे , औसापावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना उलटला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये अजूनही पेरण्या झाल्या नाहीत. पेरण्या झालेले ५० टक्के क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नाही. जे उगवले त्यांना आता पावसाची गरज आहे. परंतु, दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री चांदणे पडत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर दुष्काळाचे काजवे चमकू लागले आहेत़ जून महिना कोरडा गेला. जुलैमध्ये एकवेळा बऱ्यापैकी तर दोन-तीन वेळा अल्प पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. त्यातही सोयाबीनच्या बियाणाने मोठा दगा दिला. तालुक्यातील जवळपास २५ हजार हेक्टर्स क्षेत्रावरील सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणी करावी लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा दिसून येत आहे. तालुक्यावर दिवसभर दाटून येणारे ढग बरसत नाहीत. ते आता पावसाचे नव्हे, तर दुष्काळाचे संकेत देऊ लागले आहेत. पाणीटंचाई कायम आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुबार पेरण्या कराव्या लागत आहेत. आता पाऊस नाही आला तर काय होणार, या भीतीने सर्वांच्याच मनात काहूर निर्माण झाले आहे.औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. पेरण्यांना तब्बल महिनाभर उशीर होऊनही शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने काळ्या आईची ओटी भरली. ७० ते ८० हजार हेक्टर्स क्षेत्रावर पेरण्या उरकल्या; पण आता पाऊसच नाही. वर्षभर औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाने छळले. आधी अवकाळी, त्यानंतर गारपीट तर आता पुन्हा दुष्काळाचे गडद सावट दिसत आहे़ त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जवळचे सर्व काही संपले. बँका आणि खाजगी सावकाराच्या कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे आता शेतकरी हतबल होताना दिसत आहे. मागील वर्षी औसा तालुक्यात २१ जुलैपर्यंत २६१ मि.मी. पाऊस झाला होता. पण यावर्षी मात्र आजपर्यंत केवळ १२४.१४ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ८१३.०९ मि.मी. इतकी आहे. यावर्षी पावसाळ्याचे जवळपास ४० ते ४५ दिवस संपले, तरीही अत्यंत तोकडा पाऊस झाला आहे. तालुक्यातील आशिव, मातोळा, उजनी या पट्ट्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे दिवसभर ढग असले तरी ढगांची कोरडीच माया दिसत आहे. सध्या तालुक्यातील १० गावे व २ वाडी-तांड्यांवर १९ अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. अजून चार दिवस पाऊस नाही झाला तर आणखी गावांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. पाऊस नसल्यामुळे पाणीटंचाई अजूनही कायम आहे. दिवसभर आभाळात ढगांची गर्दी असते. पाऊस मात्र पडत नाही. रात्री चांदण्या दिसतात. दिवसभर आभाळात ढग दिसत असले तरी ‘ढगांची कोरडी माया, दुष्काळाची गडद छाया’ असे चित्र आता औसा तालुक्यात स्पष्ट दिसत आहे.चारा आणि पाणीटंचाईला प्राधान्य...सध्याच्या परिस्थितीसंदर्भात तहसीलदार दत्ता भारस्कर म्हणाले की, जिल्हास्तरावरून दुष्काळाचा सामना करण्याचे नियोजन तयार आहे. सध्या तालुक्यातील पाणीटंचाई आणि जनावरांसाठी चाराटंचाई या दोन प्रश्नांवर दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे दोन्ही प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असल्याचे भारस्कर यांनी सांगितले.