शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

वीजबिल वसुलीसाठी धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:21 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे छोट्या- मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले होते. दरम्यान, ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे छोट्या- मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले होते. दरम्यान, शासनाने सदरील काळातील वीजबिल काही प्रमाणात माफ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल माफ होण्याची प्रतीक्षा होती. परिणामी, बहुतांश ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे वीजबिले थकीत राहिली.

दरम्यान, शासनाने वीजबिलात सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. थकीत वीजबिलाचा भरणा न केल्यास महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, शहरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सकाळपासूनच वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीजबिल न भरल्यास दोन ते तीन दिवसांत वीज कनेक्शन तोडले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

१८ लाखांची वसुली...

थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. एक महिन्यापासून वीजबिल वसुली सुरू असून महिनाभरात १८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. शहरात अजूनही एक कोटी रुपयांची थकबाकी आहे, असे महावितरणचे शिवशंकर सावळे यांनी सांगितले.