शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

१७ गावांतील शेतकऱ्यांसाठी सव्वासात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST

शिरूर अनंतपाळ तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामावर पावसाचे पाणी ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामावर पावसाचे पाणी फेरले. तालुक्यातील २२ हजार ३७५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी दहा हजारांची मदत जाहीर केली होती.

पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ३२ गावांतील ११ हजार ९३२ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. परंतु, उर्वरित १७ गावांतील १० हजार ५५७ शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे अनुदानाचा लाभ देण्यात यावा, अशी सातत्याने मागणी होत होती. या शेतकऱ्यांचे अनुदानाकडे डोळे लागले होते.

अनुदानाचा या गावांना लाभ...

पहिल्या टप्प्यात ३२ गावांना ७ कोटी ४८ लाख ६९ हजार ५२९ रुपये मंजूर झाले होते. परंतु, १७ गावांतील शेतकरी प्रतीक्षेत होते. यामध्ये भिंगोली, येरोळ, रापका, लक्कड जवळगा, वांजरखेडा, शिवपूर, शेंद, सागंवी घुग्गी, सावरगाव,

सरफराजपूर, सुमठाणा, हालकी, उजेड, हिप्पळगाव, होनमाळ, साकोळ, शिरूर अनंतपाळ या गावांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान जिल्हा बँकेच्या विविध शाखांद्वारे आठवडाभरात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अतुल जटाळे, लेखाधिकारी नितीन बनसोडे यांनी सांगितले.