शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

उदगिरात श्रावणसरी बरसल्याने पिकांना जीवदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

उदगीर : मागील महिन्यात पडलेल्या पावसामुळे पिके चांगलीच बहरली होती. मात्र, महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने बहरलेली पिके सुकून जात ...

उदगीर : मागील महिन्यात पडलेल्या पावसामुळे पिके चांगलीच बहरली होती. मात्र, महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने बहरलेली पिके सुकून जात होती. काही भागात सोयाबीनला फुलं लागत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले होते. तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर अखेर सोमवारी रात्री उदगीर शहर व परिसरात पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खरिपाच्या पिकांना तात्पुरता आधार मिळाला असून, मोठ्या पावसाची आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

उदगीर तालुक्यात मृग नक्षत्राने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. अधूनमधून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे सर्वच भागात पीकपरिस्थिती उत्तम होती. काही भागात सोयाबीनला फुलं लागण्याची प्रक्रिया सुरू झाली तर काही भागात शेंगा लागण्यास सुरुवात झाल्याने पावसाची गरज असतानाच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मागील काही वर्षांपासून उदगीर तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक बनले आहे. चांगले उत्पादन देण्याची क्षमता सोयाबीनमध्ये असल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीनचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. त्यातच पेरणीच्या वेळी सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने याहीवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रात दोन हजार हेक्टरने वाढ केली आहे. तालुक्याचे खरिपाचे ६४ हजार हेक्टर क्षेत्र असून सर्वाधिक ४४ हजार ५६५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. त्यापाठोपाठ तूर १२ हजार ९६५ हेक्टर, ज्वारी १ हजार ९३६ हेक्टर, उडीद १ हजार २०५ हेक्टर, मूग १ हजार ५४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यात पेरणी झाली. पेरण्या झाल्यानंतर अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही भागात खोड अळींचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतकऱ्यांनी महागडे औषध घेऊन त्याचा बंदोबस्त केला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर २५ दिवस पावसाने उघडीप दिल्याने पिके दुपार धरू लागली होती. दीर्घ विश्रांतीनंतर सोमवारी पडलेल्या पावसाने खरिपाच्या पिकाला तात्पुरते जीवदान मिळाले आहे.

पिकांना मिळाला तात्पुरता दिलासा...

मागील पंचवीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. सोमवारी पडलेल्या पावसाने केवळ माना टाकलेल्या पिकाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. खरिपाच्या पिकावरील संकट अद्याप टळलेले नसून मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. बाबूराव मलकापुरे, शेतकरी.

आतापर्यंत ६१८ मि.मी. पावसाची नाेंद...

आतापर्यंत उदगीर तालुक्यात सर्वाधिक ६१८ मि.मी. पाऊस झाला आहे. सोमवारी रात्री उदगीर महसूल मंडळात ५, नागलगाव २, मोघा ३, हेर २६, वाढवणा १८, नळगीर ६, देवर्जन १५ तर तोंडार मंडळात १६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.