शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

उदगिरात श्रावणसरी बरसल्याने पिकांना जीवदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

उदगीर : मागील महिन्यात पडलेल्या पावसामुळे पिके चांगलीच बहरली होती. मात्र, महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने बहरलेली पिके सुकून जात ...

उदगीर : मागील महिन्यात पडलेल्या पावसामुळे पिके चांगलीच बहरली होती. मात्र, महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने बहरलेली पिके सुकून जात होती. काही भागात सोयाबीनला फुलं लागत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले होते. तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर अखेर सोमवारी रात्री उदगीर शहर व परिसरात पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खरिपाच्या पिकांना तात्पुरता आधार मिळाला असून, मोठ्या पावसाची आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

उदगीर तालुक्यात मृग नक्षत्राने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. अधूनमधून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे सर्वच भागात पीकपरिस्थिती उत्तम होती. काही भागात सोयाबीनला फुलं लागण्याची प्रक्रिया सुरू झाली तर काही भागात शेंगा लागण्यास सुरुवात झाल्याने पावसाची गरज असतानाच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मागील काही वर्षांपासून उदगीर तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक बनले आहे. चांगले उत्पादन देण्याची क्षमता सोयाबीनमध्ये असल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीनचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. त्यातच पेरणीच्या वेळी सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने याहीवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रात दोन हजार हेक्टरने वाढ केली आहे. तालुक्याचे खरिपाचे ६४ हजार हेक्टर क्षेत्र असून सर्वाधिक ४४ हजार ५६५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. त्यापाठोपाठ तूर १२ हजार ९६५ हेक्टर, ज्वारी १ हजार ९३६ हेक्टर, उडीद १ हजार २०५ हेक्टर, मूग १ हजार ५४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यात पेरणी झाली. पेरण्या झाल्यानंतर अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही भागात खोड अळींचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतकऱ्यांनी महागडे औषध घेऊन त्याचा बंदोबस्त केला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर २५ दिवस पावसाने उघडीप दिल्याने पिके दुपार धरू लागली होती. दीर्घ विश्रांतीनंतर सोमवारी पडलेल्या पावसाने खरिपाच्या पिकाला तात्पुरते जीवदान मिळाले आहे.

पिकांना मिळाला तात्पुरता दिलासा...

मागील पंचवीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. सोमवारी पडलेल्या पावसाने केवळ माना टाकलेल्या पिकाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. खरिपाच्या पिकावरील संकट अद्याप टळलेले नसून मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. बाबूराव मलकापुरे, शेतकरी.

आतापर्यंत ६१८ मि.मी. पावसाची नाेंद...

आतापर्यंत उदगीर तालुक्यात सर्वाधिक ६१८ मि.मी. पाऊस झाला आहे. सोमवारी रात्री उदगीर महसूल मंडळात ५, नागलगाव २, मोघा ३, हेर २६, वाढवणा १८, नळगीर ६, देवर्जन १५ तर तोंडार मंडळात १६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.