यावेळी नायब तहसीलदार श्रावण उगले, मंडल अधिकारी चव्हाण, कृषी सहायक पाखरे, तलाठी एम. बी. माशाळे, शिवाजीराव बावणे, महेश अन्नदाते, बळीराम झारे, दिनेश नानजकर, श्यामराव थळकर, नवनाथ कदम, जयपाल बाराते, अनंत गणगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
३० सप्टेंबरपर्यंत कराव्यात नोंदी...
शेतकऱ्यांच्या झाडाच्या, फळबाग यांच्या नोंदी ॲपद्वारे ७/१२ वर लावाव्यात. महसूल विभागामार्फत खात्री करूनच ठेवल्या जातील. तांदुळजा व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणीद्वारे आपापल्या शेतातील माहिती भरून घ्यावी व काही अडचण आली, तर कृषी सहायक, तलाठी यांच्याशी संपर्क करावा, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. तसेच पांडुरंग सुभाष गणगे यांच्या शेतातील अश्वगंधा या पिकाची पाहणी करण्यात आली. नवनवीन प्रयोग करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांनी कौतुकही केले.
कॅप्शन :
तांदुळजा येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बांधावर जाऊन ई पीक नोंदणी करून दाखविली. यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार श्रावण उगले, शिवाजीराव बावणे, तलाठी माशाळे.