शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

ढगाळ वातावरणामुळे उभी तूर वाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST

उदगीर : चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेले आहे. काही भागात तर तुरीचा ...

उदगीर : चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेले आहे. काही भागात तर तुरीचा खराटाच झाला आहे. सोयाबीन पाठोपाठ आता तुरीचेही नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.

यंदा पेरणीवेळी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. परंतु, ऐन काढणीच्यावेळी अति पाऊस झाल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. एकरी उत्पादन निम्मावर आल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या. खरीपातील सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा तुरीवर होत्या. परंतु, मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने वाढवणा, हाळी, हेर, देवर्जन, मोघा, नळगीर, नागलगाव, तोंडार, कुमठा, लोहारा, दावणगाव, रावणगावसह तालुक्यातील तुरीला फटका बसला आहे.

शेतातील तुरीचे उभे पीक वाळून सर्व पाने गळून गेली आहेत. तालुक्यात तुरीचा १३ हजार ५८१ हेक्टरवर पेरा झाला होता. ज्या शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी आपल्या पिकांना पाणी देणे सुरु केले आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना खराब हवामानाचा फटका बसला आहे. सोयाबीनचे उत्पन्न थोड्याफार प्रमाणात हाती आले. परंतु, तुरीचे पीक निसर्गाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण व धुके पडल्याने तुरीसह हरभरा पिकाला मोठा फटका बसला.

पुन्हा हातचे पीक हिरावले गेले...

यंदा सोयाबीनचे पीक चांगले होते. परंतु ऐन राशीच्या वेळी झालेल्या पावसाने नुकसान झाले. सोयाबीन डागी झाल्याने बाजारात दरही चांगला मिळाला नाही. आता आशा तुरीवर होत्या. परंतु, ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांत तुरीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन केले असते तर काही तरी उपाययोजना केली असती, असे किनी यल्लादेवी येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारगुडे यांनी सांगितले.