शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

ढगाळ वातावरणामुळे उभी तूर वाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST

उदगीर : चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेले आहे. काही भागात तर तुरीचा ...

उदगीर : चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेले आहे. काही भागात तर तुरीचा खराटाच झाला आहे. सोयाबीन पाठोपाठ आता तुरीचेही नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.

यंदा पेरणीवेळी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. परंतु, ऐन काढणीच्यावेळी अति पाऊस झाल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. एकरी उत्पादन निम्मावर आल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या. खरीपातील सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा तुरीवर होत्या. परंतु, मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने वाढवणा, हाळी, हेर, देवर्जन, मोघा, नळगीर, नागलगाव, तोंडार, कुमठा, लोहारा, दावणगाव, रावणगावसह तालुक्यातील तुरीला फटका बसला आहे.

शेतातील तुरीचे उभे पीक वाळून सर्व पाने गळून गेली आहेत. तालुक्यात तुरीचा १३ हजार ५८१ हेक्टरवर पेरा झाला होता. ज्या शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी आपल्या पिकांना पाणी देणे सुरु केले आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना खराब हवामानाचा फटका बसला आहे. सोयाबीनचे उत्पन्न थोड्याफार प्रमाणात हाती आले. परंतु, तुरीचे पीक निसर्गाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण व धुके पडल्याने तुरीसह हरभरा पिकाला मोठा फटका बसला.

पुन्हा हातचे पीक हिरावले गेले...

यंदा सोयाबीनचे पीक चांगले होते. परंतु ऐन राशीच्या वेळी झालेल्या पावसाने नुकसान झाले. सोयाबीन डागी झाल्याने बाजारात दरही चांगला मिळाला नाही. आता आशा तुरीवर होत्या. परंतु, ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांत तुरीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन केले असते तर काही तरी उपाययोजना केली असती, असे किनी यल्लादेवी येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारगुडे यांनी सांगितले.