शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

ढगाळ वातावरणामुळे उभी तूर वाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST

उदगीर : चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेले आहे. काही भागात तर तुरीचा ...

उदगीर : चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेले आहे. काही भागात तर तुरीचा खराटाच झाला आहे. सोयाबीन पाठोपाठ आता तुरीचेही नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.

यंदा पेरणीवेळी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. परंतु, ऐन काढणीच्यावेळी अति पाऊस झाल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. एकरी उत्पादन निम्मावर आल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या. खरीपातील सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा तुरीवर होत्या. परंतु, मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने वाढवणा, हाळी, हेर, देवर्जन, मोघा, नळगीर, नागलगाव, तोंडार, कुमठा, लोहारा, दावणगाव, रावणगावसह तालुक्यातील तुरीला फटका बसला आहे.

शेतातील तुरीचे उभे पीक वाळून सर्व पाने गळून गेली आहेत. तालुक्यात तुरीचा १३ हजार ५८१ हेक्टरवर पेरा झाला होता. ज्या शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी आपल्या पिकांना पाणी देणे सुरु केले आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना खराब हवामानाचा फटका बसला आहे. सोयाबीनचे उत्पन्न थोड्याफार प्रमाणात हाती आले. परंतु, तुरीचे पीक निसर्गाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण व धुके पडल्याने तुरीसह हरभरा पिकाला मोठा फटका बसला.

पुन्हा हातचे पीक हिरावले गेले...

यंदा सोयाबीनचे पीक चांगले होते. परंतु ऐन राशीच्या वेळी झालेल्या पावसाने नुकसान झाले. सोयाबीन डागी झाल्याने बाजारात दरही चांगला मिळाला नाही. आता आशा तुरीवर होत्या. परंतु, ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांत तुरीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन केले असते तर काही तरी उपाययोजना केली असती, असे किनी यल्लादेवी येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारगुडे यांनी सांगितले.